शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:36 IST

भंगार व्यावसायिकांमुळे सुरक्षा वाऱ्यावर : काही तासांत आगीवर नियंत्रण

दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिल्वो लायकल या बंद कारखान्यात बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासातच ही आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे कारण बेजबाबदारपणे होत असलेले भंगार तोडकाम असल्याचे बोलले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आली नसती तर मोठी हानी झाली असती.

महाड एमआयडीसीमधील सिल्वो लायकल ही कंपनी गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. या बंद कंपनीतील भंगार काढण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे जागोजागी वेल्डिंग आणि इतर कामे सुरू आहेत. या कंपनीत बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नसले तरी त्या ठिकाणी सुरू असलेले भंगार तोडकाम यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी या बंद कंपनीचे रसायनाने भरलेले ड्रम होते. मात्र, आग तत्काळ आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे. महाड औद्योगिक महामंडळाच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली.

ही कंपनी बंद होऊन २० वर्षे झाली आहेत. या कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम आजही त्या ठिकाणी आहेत. मात्र, हे ड्रम त्याच कारखान्याचे आहेत की इतर कोणाचे आणि त्यात कोणते रसायन आहे हे अद्याप कळले नाही. मात्र, कंपनीत विविध ठिकाणी रसायनाने भरलेल्या गोणी, ड्रम तसेच पडून आहेत. महाड एमआयडीसीमध्ये अनेक बंद कारखान्यात अशीच अवस्था आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात यातील रसायन पाण्यामुळे बाहेर पडत असते. तर कारखाना बंद असल्याने स्थानिक नागरिकांची जनावरे या ठिकाणी वावरत असतात. याचा त्रास जनावरे आणि नागरिकांना होऊ शकतो. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. या बंद कंपनीत भंगार व्यावसायिक भंगार तोडण्याचे असुरक्षित काम करत आहेत. या कामगारांकडे कोणतीच सुरक्षा साधने दिसून येत नसल्याने कामगार सुरक्षा विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रात भंगार व्यावसायिकांचा शिरकाव आहे. कारखानदार कारखाने सुरू असतानाही आपल्या कारखान्यात नेहमी भंगार तोडफोडीचे काम करत असतात. यापूर्वीही अनेक घटना भंगार तोडकाम करत असताना घडल्या आहेत. यामध्ये मजुरांचे जीव गेले आहेत. कारखान्याची सुरक्षा ही कामगार सुरक्षा विभागाकडे असून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा होणाºया घटनांना कारखानदार आणि भंगार व्यावसायिक जबाबदार असल्याचे दिसून येत आहे, अशा बेजबाबदारपणामुळे कधीही आगडोंब होण्यास वेळ लागणार नाही. यावर संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.या कंपनीत होणारे स्फोट आणि प्रदूषणाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत स्फोटखोपोली शहरातील इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड या कंपनीत बुधवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या तीन स्फोटांनी कंपनीत आग लागली. स्फोटांमुळे खोपोली शहराच्या अनेक भागात हादरे बसले. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. साधारणपणे दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील काही इमारतींना व घरांना तडे गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. एप्रिल महिन्यातही दुपारी या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या कंपनीत वारंवार अशा घटना घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदेश धावारे यांनी सांगितले. विहारी, सिद्धार्थनगर, लक्ष्मीनगर येथील नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत.

टॅग्स :fireआग