शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

उरण शहरातील अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग; ३० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2023 13:51 IST

आर्थिक नुकसान झाल्याने लग्नाच्या खर्चाची चिंता सतावतेय.

मधुकर ठाकूर, उरण : उरण शहरातील रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी लागलेल्या आगीत शेजारीच राहणाऱ्या परेश तेरडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुलीच्या लग्नाच्या कामांची लगबग सुरू असतानाच आगीच्या ज्वाळांनी घरातील झालेल्या लाखों रुपयांच्या नुकसानीमुळे मुलीचे लग्न कसे पार पाडायचे याचीच चिंता तेरडे यांना सतावते आहे.

उरण शहरात २६ भंगाराची दुकाने आहेत.शहरातील बोरी-पाखाडी येथील विविध शासकीय जागांवरच तर भंगारांच्या दुकानांचा विळखाच पडला आहे. दलदलीची असो की मोकळी जागा दिसली रे दिसली  कि त्या जागेवर परप्रांतीयांनी भंगाराचे दुकान टाकले म्हणून समजा.भंगारचे दुकान उभारणे आता खार्चिक राहिले नाही.जुने वासे, बांबू आणि जुनी पत्रे असली की भंगाराचे दुकान,गोदाम तयार.मात्र स्थानिक पुढारी नेते , स्थानिक पोलीस, प्रशासन यांना महिनाकाठी चिरिमिरी दिल्याखेरीज ही भंगाराची दुकाने अस्तित्वात येत नाहीत.दुदैवाने हेही तितकेच खरे आहे.मात्र दररोज मोठ्या प्रमाणावर भंगार खरेदी करून कुठून आणतात आणि कुठे विकतात यांचा अंदाज कुणालाच लागलेला नाही.अशा या मोठ्या प्रमाणावर अचानक उगवून नंतर कायम अस्तित्वात येणाऱ्या भंगारांची दुकाने, गोदामांविरोधात आजुबाजुला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी केल्या असल्या तरी त्याकडे कायमच दुर्लक्षच केले जात असल्याची तक्रारदारांचीच तक्रार आहे.

स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचे शुक्रवारी रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला लागलेली भीषण आग एक विदारक उदाहरण आहे. शुक्रवारी (२७) बोरी स्मशानभूमी शेजारीच असलेल्या रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्यागोदामाला भीषण आग लागली.या आगीत प्लास्टिक, लाकडाचे पॅलेट, प्लायवूड, केबल,रासायनिक केमिकलचे ड्रम, लोखंड आणि ज्वालाग्राही पदार्थांनीपेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीत गोदामाच्या आजुबाजुला असलेली अनेक घरे, इमारती धोक्यात आल्या.

गोदामाच्या कंपाऊंडच्या बाजूलाच असलेल्या परेश तेरडे यांच्या इमारतीलाही आगीच्या ज्वाळांनी घेरले आणि पाहता पाहता घरातील सामान आगीच्या ज्वाळांनी वितळून गेले.तेरडे यांच्या मुलीचे लग्न ७ डिसेंबर रोजी ठरले आहे.यासाठी त्यांच्या इमारतीतील प्लॉटमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरु होती. प्लॉटमध्ये रंगरंगोटी करण्यात आली होती.१५-१८ लाख रुपये खर्चून नवीन फर्निचरही बनवून घेतले होते.मुलीच्या लग्नासाठी नवीन सामान, कपडेलत्तेही खरेदी करून ठेवण्यात आले होते.प्लॉटमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच शेजारीच असलेल्या रमझान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली.या आगीत इमारतीच्या खिडकीच्या तावदानांना तडे गेले.आगीच्या ज्वालामुळे आणि पाहता पाहता घरातील नव्याने बनवून घेण्यात आलेले फर्निचर ,फ्रीज, टीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक सामान, रंगरंगोटी केलेल्या भिंती,फरशा,सायकल आगीच्या ज्वाळांनी वितळून गेल्या आहेत.या आगीत परेश तेरडे यांचे सुमारे ३० लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

मुलीच्या लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच खर्च केलेले ३० लाख आगीत स्वाहा झाल्याने मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चिंता भेडसावत असल्याने परेश तेरडे चिंतेत सापडले आहेत.मागील १५-२० वर्षांपासून या अनधिकृत भंगाराच्या गोदामांविरोधात आजुबाजुच्या रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.त्यांच्यावर पण.पोलिस व स्थानिक प्रशासनाकडे कारवाईची अपेक्षा असताना मात्र भंगार माफियांकडूनच धमक्या दिल्या जात होत्या.अशी खंत परेश तेरडे यांनी व्यक्त केली आहे.

परप्रांतीयांच्या वाढत्या दादागिरीला पोलिस व स्थानिक प्रशासनच अधिक जबाबदार असल्याचाही तेरडे यांचा आरोप आहे. नुकसानभरपाई मिळावी यासाठी नुकतीच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील, उरण शहर अध्यक्ष प्रकाश पाटील आणि महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांनी परेश तेरडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त झोपड्यांचीही पाहणी केली.

टॅग्स :fireआग