शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. पाळीव तसेच मोकाट जनावरांना उष्माघात आणि कोल्ड स्ट्रोकची बाधा होत आहे, तर भर उन्हात फिरणाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाळीव जनावरांमध्ये बकºया, कोंबड्या यांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रतिवर्षी वाढतच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसात हा परिणाम कोकणात देखील जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान ३५ ते ४० अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या उष्म्याचा फटका जसा मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे. कोकणात ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात जनावरे उघड्यावर मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात यामुळे कोल्ड स्ट्रोक येतो आणि जनावर दगावले जाते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वणव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते खातात. अनेक वेळा लग्न सोहळ्याच्या वेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्याने देखील जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यातील तीव्र उष्म्याने जनावरांना त्रासदायक ठरत आहे.आरोग्याच्या समस्यातळपत्या उन्हात फिरल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत. डोके दुखणे, ताप येणे, सर्दीचा त्रास, चक्कर अशी लक्षणे असलेले रुग्ण सध्या दवाखान्यात आढळून येत आहेत. महाड आणि परिसरात कधी नव्हे ते यावर्षी तापमानाचा पारा चढला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास सावलीमध्ये उभे राहावे, अंग थंड पाण्याने पुसावे, लहान मुलांना उन्हात पाठवू नये.- डॉ. अजित पुल्ले,

महाडग्रामीण भागातील शेतकºयांनी आपली जनावरे सकाळी १० च्या आत सोडून पुन्हा गोठ्यात आणली पाहिजे, शिवाय जनावरांना देखील चांगले पाणी आणि चारा वेळेवर दिला पाहिजे. लसीकरण आणि वेळीच उपचार करून घेतल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.- डॉ. डी.एस.सोनावले,सह आयुक्त पशुवैद्यकीय केंद्र 

टॅग्स :RaigadरायगडHeat Strokeउष्माघात