शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. पाळीव तसेच मोकाट जनावरांना उष्माघात आणि कोल्ड स्ट्रोकची बाधा होत आहे, तर भर उन्हात फिरणाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाळीव जनावरांमध्ये बकºया, कोंबड्या यांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रतिवर्षी वाढतच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसात हा परिणाम कोकणात देखील जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान ३५ ते ४० अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या उष्म्याचा फटका जसा मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे. कोकणात ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात जनावरे उघड्यावर मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात यामुळे कोल्ड स्ट्रोक येतो आणि जनावर दगावले जाते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वणव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते खातात. अनेक वेळा लग्न सोहळ्याच्या वेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्याने देखील जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यातील तीव्र उष्म्याने जनावरांना त्रासदायक ठरत आहे.आरोग्याच्या समस्यातळपत्या उन्हात फिरल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत. डोके दुखणे, ताप येणे, सर्दीचा त्रास, चक्कर अशी लक्षणे असलेले रुग्ण सध्या दवाखान्यात आढळून येत आहेत. महाड आणि परिसरात कधी नव्हे ते यावर्षी तापमानाचा पारा चढला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास सावलीमध्ये उभे राहावे, अंग थंड पाण्याने पुसावे, लहान मुलांना उन्हात पाठवू नये.- डॉ. अजित पुल्ले,

महाडग्रामीण भागातील शेतकºयांनी आपली जनावरे सकाळी १० च्या आत सोडून पुन्हा गोठ्यात आणली पाहिजे, शिवाय जनावरांना देखील चांगले पाणी आणि चारा वेळेवर दिला पाहिजे. लसीकरण आणि वेळीच उपचार करून घेतल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.- डॉ. डी.एस.सोनावले,सह आयुक्त पशुवैद्यकीय केंद्र 

टॅग्स :RaigadरायगडHeat Strokeउष्माघात