शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रसायनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:22 IST

रसायनी येथील आठपेक्षा जास्त गावांची १६०० एकर जमीन भारत सरकारने १९६० मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमीन कंपनीने वापरात आणली तर काही जमीन शिल्लक असून तेथे गेल्या साठ वर्षे शेतक-यांची वहिवाट असून शेतलागवड केली जाते.

मोहोपाडा : रसायनी येथील आठपेक्षा जास्त गावांची १६०० एकर जमीन भारत सरकारने १९६० मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमीन कंपनीने वापरात आणली तर काही जमीन शिल्लक असून तेथे गेल्या साठ वर्षे शेतक-यांची वहिवाट असून शेतलागवड केली जाते. कंपनीने वापर न केलेली जमीन मूळ मालक शेतकºयांना परत देता येणार नाही अशी भूमिका सरकारने घेतल्याने शुक्रवारी २३ मार्चपासून रसायनी एचओसी गेटजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आता नाही तर कधीच नाही या आशयाखाली रसायनीतील वेगवेगळ्या भागातून शेतकरी एकवटून त्यांनी चांभार्लीहून मोहोपाडा मार्गे रॅली काढली. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशी घोषणा देत रॅली एचओसीजवळ आली.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांची रॅली एचओसी गेटसमोर येवून पदाधिकाºयांनी आपापल्या भाषणातून मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या मागणीबाबत बारा वर्षांत सरकार स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ आॅक्टोबर २०१७ रोजी मंत्रालयात रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांची एचओसीबाबत बैठक बोलावली होती. यावेळी शेतकºयांनी कंपनीची जमीन विकण्यास विरोध केला होता. त्यावेळी सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने या परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने समीर खाने यांनी सांगितले. रसायनी परिसरातील १९६० साली भूसंपादित जमीन विक्र ी करण्यास देण्यात आलेली परवानगी रद्द करावी व शेतकºयांच्या वहिवाटीतील जमिनी परत मिळाव्यात, शासनाने शिल्लक जमीन ही मूळ मालकाला परत देता येणार नाही ही एनओसी रद्द करून २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास मंगळवार २७ मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकºयांनी दिला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य ,आजी-माजी सभापती व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :Farmerशेतकरी