शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मुंबई-गोवा मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 06:34 IST

पर्यायी मार्गावर पाणी तुंबण्याची शक्यता

- सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणास्तव सातत्याने ठप्प होत आहे. यंदादेखील कामाला अडथळा निर्माण झाला असून ऐन पावसाळ्यात हा मार्ग दरडी आणि पाणी तुंबल्याने ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे कामदेखील २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन सरकारने दिले होते. मात्र, अद्याप काम सुरूच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउन झाल्याने कामे ठप्प होती.

महाडजवळ सुरू असलेले नांगलवाडी आणि केंबुर्ली गावाजवळील डोंगर फोडण्याचे कामदेखील थांबले. नांगलवाडी गावाजवळ नदीतून पर्यायी मार्ग काढण्यात आला. मात्र, लॉकडाउनमुळे या मार्गाचा वापर थांबला होता. तर केंबुर्ली गावाजवळ डोंगर फोडण्याचे कामही अपूर्णच आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात नांगलवाडी गावाजवळ तयार केलेल्या पर्यायी मार्गावर दरड आणि नदीतील पाणी येण्याची शक्यता आहे. तर केंबुर्लीजवळही दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इंदापूर ते पोलादपूरदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यालगत माती ठेवण्यात आली, शिवाय चौपदरीकरणातील भराव रस्त्यावर पडला आहे. यामुळे पाणी आणि चिखलही साचण्याची शक्यता आहे. नुकत्याच पडलेल्या अवेळी पावसामुळे जागोजागी पाणी साचले होते. सध्या काही ठिकाणी महामार्गावर कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, पाऊस तोंडावर असल्याने ही कामे पूर्ण होणे कठीण आहे. कोरोनाच्या भीतीमुळे परिसरातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने काम रखडण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कामे सुरू केली आहेत, शिवाय पावसाळ्यात अडचण होणार नाही, यासाठी काळजी घेतली जात आहे.- अमोल महाडकर, प्रभारी अधिकारी, महामार्ग

नांगलवाडीजवळ जुना मार्ग मोकळा केला जाईल. यामुळे पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला तरी अडचण निर्माण होणार नसल्याचे या वेळी महामार्गाच्या काम करणाºया एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे प्रकल्प अधिकारी नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड