शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

इच्छुकांकडून दगाफटक्याची भीती

By admin | Updated: January 28, 2017 02:58 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी त्या-त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे उतावीळ झाले आहेत

आविष्कार देसाई /अलिबागजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी त्या-त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे उतावीळ झाले आहेत. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास ते दुसऱ्या पक्षात जाऊन दगाफटका करण्याची भीती असल्याने अद्यापही कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. ३०, ३१ जानेवारीला शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख जवळ येत आहे, तसे राजकीय रणांगण तापायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे इनकमिंग, आऊटगोर्इंग सुरू झाले आहे. सध्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे काम विरोधातील शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा यांना करावे लागणार आहे. त्या दिशेने शिवसेनेने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते. शिवसेनेत प्रवेश करण्याचा कल सध्या रायगडच्या राजकारणात दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी त्यांचा पुत्र वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत फारकत घेतली. २८ जानेवारीला ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी ते अन्य मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे कळते.२१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडणार आहे. त्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी बहुतेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची अपेक्षा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे सर्वांनीच उमेदवारी मिळण्याबाबत तगादा लावला आहे. पक्षश्रेष्ठींना थेट उमेदवारीबाबत बोलता येत नसल्याने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवू, अशा राजकीय वावड्या हस्तकांमार्फत उठविल्या जात आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाला आपल्या पक्षात घेऊन त्याला कन्फर्म तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केल्याचेही बोलले जात आहे. आधीच उमेदवारी जाहीर केली, तर इच्छुक उमेदवारांची नाराजी ओढावून घेण्याची धास्ती कोणत्याही पक्षाला लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तोंडावरच थेट उमेदवारी जाहीर करण्याचा कल शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असावा, असे वाटते. कारण ३०, ३१ जानेवारीला त्यांच्या आघाडीचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.काँग्रेस आणि शिवसेनेने अलिबाग, पेण तालुक्यात आघाडी केली आहे. अलिबाग तालुक्यातील सातपैकी चार मतदार संघात काँग्रेस, तर तीन मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पैकी थळ मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तर चौल मतदार संघातून शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे आणि मापगाव मतदार संघातून काँग्रेसचे राजा ठाकूर निवडणूक लढणार असल्याचे पक्के झाले आहे. दुसरीकडे शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने मापगावमधून दिलीप भोईर ऊर्फ छोटम यांना तर, चौल मतदार संघातून नंदू मयेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.या सर्व राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास इच्छुक उमेदवारांना गाफील ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे अधोरेखित होते. इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला, उमेदवारी अर्ज दाखल करण्याला योग्य वेळ मिळू न देणे, प्रचाराला जादा वेळ न देणे असे अडथळे निर्माण करुन त्यांचे खच्चीकरण करण्याची सोयच त्यांनी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे इच्छुकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.दरम्यान, इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची मनाशी खुणगाठ बांधली असेल तर, त्यांना रोखणे कोणत्याही पक्षाला कठीण जाणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.