शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून दगाफटक्याची भीती

By admin | Updated: January 28, 2017 02:58 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी त्या-त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे उतावीळ झाले आहेत

आविष्कार देसाई /अलिबागजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी त्या-त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे उतावीळ झाले आहेत. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास ते दुसऱ्या पक्षात जाऊन दगाफटका करण्याची भीती असल्याने अद्यापही कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. ३०, ३१ जानेवारीला शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख जवळ येत आहे, तसे राजकीय रणांगण तापायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे इनकमिंग, आऊटगोर्इंग सुरू झाले आहे. सध्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे काम विरोधातील शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा यांना करावे लागणार आहे. त्या दिशेने शिवसेनेने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते. शिवसेनेत प्रवेश करण्याचा कल सध्या रायगडच्या राजकारणात दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी त्यांचा पुत्र वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत फारकत घेतली. २८ जानेवारीला ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी ते अन्य मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे कळते.२१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडणार आहे. त्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी बहुतेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची अपेक्षा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे सर्वांनीच उमेदवारी मिळण्याबाबत तगादा लावला आहे. पक्षश्रेष्ठींना थेट उमेदवारीबाबत बोलता येत नसल्याने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवू, अशा राजकीय वावड्या हस्तकांमार्फत उठविल्या जात आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाला आपल्या पक्षात घेऊन त्याला कन्फर्म तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केल्याचेही बोलले जात आहे. आधीच उमेदवारी जाहीर केली, तर इच्छुक उमेदवारांची नाराजी ओढावून घेण्याची धास्ती कोणत्याही पक्षाला लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तोंडावरच थेट उमेदवारी जाहीर करण्याचा कल शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असावा, असे वाटते. कारण ३०, ३१ जानेवारीला त्यांच्या आघाडीचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.काँग्रेस आणि शिवसेनेने अलिबाग, पेण तालुक्यात आघाडी केली आहे. अलिबाग तालुक्यातील सातपैकी चार मतदार संघात काँग्रेस, तर तीन मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पैकी थळ मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तर चौल मतदार संघातून शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे आणि मापगाव मतदार संघातून काँग्रेसचे राजा ठाकूर निवडणूक लढणार असल्याचे पक्के झाले आहे. दुसरीकडे शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसने मापगावमधून दिलीप भोईर ऊर्फ छोटम यांना तर, चौल मतदार संघातून नंदू मयेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.या सर्व राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास इच्छुक उमेदवारांना गाफील ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे अधोरेखित होते. इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला, उमेदवारी अर्ज दाखल करण्याला योग्य वेळ मिळू न देणे, प्रचाराला जादा वेळ न देणे असे अडथळे निर्माण करुन त्यांचे खच्चीकरण करण्याची सोयच त्यांनी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे इच्छुकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.दरम्यान, इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची मनाशी खुणगाठ बांधली असेल तर, त्यांना रोखणे कोणत्याही पक्षाला कठीण जाणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.