शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:54 IST

सैनिक संघटनेचे निवेदन : जिल्हाधिकारी देणार कार्यवाहीचे आदेश

अलिबाग : भारत देशाच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने जवान देणाऱ्या महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावामध्ये सुविधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने गावातील विकासाकडे लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना दिले. समस्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश देऊन पुढील सात दिवसांत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

फौजी आंबवडे या गावाला सुमारे २५० वर्षांपासून सैनिक कुटुंबांची परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळापासून या गावातील नागरिक सैनिकी सेवेत आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये याच गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यातील सहा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश राजवटीत गावात स्मारक उभारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धामध्ये तब्बल ३५० सैनिकांचा सहभाग होता. १९६५ च्या युद्धामध्येही गावातील सैनिकांनी दुष्मन सैन्याशी दोन हात केले होते. त्यामध्ये सुभेदार रघुनाथ कदम हे शहीद झाले होते. त्यानंतर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ४०० सैनिकांनी सहभाग घेत अतुलनीय पराक्रम केला होता. नायक मनोहर पवार यांना सेवा मेडल प्रदान करण्यात आले होते.तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांच्या शिफारशीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या गावाल भेट देऊन फौजी आंबवडे हे नाव दिले होते. गावातील सैनिकांनी देशाची सेवा केली आहे आणि आजही करत आहेत; परंतु हेच गाव विकासापासून वंचित राहिले आहे. गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा असून नसल्या सारख्याच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस, बाळाराम पवार, प्रभाकर जाधव, गंगाराम पवार आदी उपस्थित होते.या सुविधांची गावाला आहे गरजच्महाड-फौजी आंबवडे रस्ता अपूर्ण आहे. रस्त्याचे डांबरीकरण सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले आहे, त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असल्याने रस्त्याचे तातडीने काम होणे गरजेचे आहे.च्पोलादपूर तालुक्याला जोडणार रस्ता २० वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. त्याचेही काम अर्धवट आहे. या रस्त्याचे काम झाल्यास फौजी आंबवडे, शिरवली, पांगारी, विन्हेरे, रावतळी, फाळकेवाडी, ताम्हाणे, कावळे कुंभर्डे, गवाडी ही गावे पोलादपूर तालुक्याच्या संपर्कात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावात एकूण २३ वाड्या आहेत त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत रस्ते आणि साकव (पूल) बांधणे गरजेचे आहे.1गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खिंडवाडी ते अहिरेवाडी, मधला कोंड ते चिंचेची वाडी आणि सावळेवाडी अशा तीन योजना आहेत. पाइपलाइन खराब झाली आहे, तसेच धरणातून थेट पाणी येत असल्याने ते पिण्यालायक नसते, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.2गावातील शहीद स्मारकांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण रायगड जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. त्याचे कामही अर्धवट स्थितीच आहे. त्याचप्रमाणे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.आरोग्य सुविधा नाहीच्गावामध्ये उपआरोग्य केंद्र आहे; परंतु सातत्याने मागणी करूनही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्ध माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, लहान मुले यांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा प्राप्त होत नाहीत. गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड