शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:54 IST

सैनिक संघटनेचे निवेदन : जिल्हाधिकारी देणार कार्यवाहीचे आदेश

अलिबाग : भारत देशाच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने जवान देणाऱ्या महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावामध्ये सुविधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने गावातील विकासाकडे लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना दिले. समस्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश देऊन पुढील सात दिवसांत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

फौजी आंबवडे या गावाला सुमारे २५० वर्षांपासून सैनिक कुटुंबांची परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळापासून या गावातील नागरिक सैनिकी सेवेत आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये याच गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यातील सहा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश राजवटीत गावात स्मारक उभारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धामध्ये तब्बल ३५० सैनिकांचा सहभाग होता. १९६५ च्या युद्धामध्येही गावातील सैनिकांनी दुष्मन सैन्याशी दोन हात केले होते. त्यामध्ये सुभेदार रघुनाथ कदम हे शहीद झाले होते. त्यानंतर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ४०० सैनिकांनी सहभाग घेत अतुलनीय पराक्रम केला होता. नायक मनोहर पवार यांना सेवा मेडल प्रदान करण्यात आले होते.तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांच्या शिफारशीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या गावाल भेट देऊन फौजी आंबवडे हे नाव दिले होते. गावातील सैनिकांनी देशाची सेवा केली आहे आणि आजही करत आहेत; परंतु हेच गाव विकासापासून वंचित राहिले आहे. गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा असून नसल्या सारख्याच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस, बाळाराम पवार, प्रभाकर जाधव, गंगाराम पवार आदी उपस्थित होते.या सुविधांची गावाला आहे गरजच्महाड-फौजी आंबवडे रस्ता अपूर्ण आहे. रस्त्याचे डांबरीकरण सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले आहे, त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असल्याने रस्त्याचे तातडीने काम होणे गरजेचे आहे.च्पोलादपूर तालुक्याला जोडणार रस्ता २० वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. त्याचेही काम अर्धवट आहे. या रस्त्याचे काम झाल्यास फौजी आंबवडे, शिरवली, पांगारी, विन्हेरे, रावतळी, फाळकेवाडी, ताम्हाणे, कावळे कुंभर्डे, गवाडी ही गावे पोलादपूर तालुक्याच्या संपर्कात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावात एकूण २३ वाड्या आहेत त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत रस्ते आणि साकव (पूल) बांधणे गरजेचे आहे.1गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खिंडवाडी ते अहिरेवाडी, मधला कोंड ते चिंचेची वाडी आणि सावळेवाडी अशा तीन योजना आहेत. पाइपलाइन खराब झाली आहे, तसेच धरणातून थेट पाणी येत असल्याने ते पिण्यालायक नसते, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.2गावातील शहीद स्मारकांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण रायगड जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. त्याचे कामही अर्धवट स्थितीच आहे. त्याचप्रमाणे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.आरोग्य सुविधा नाहीच्गावामध्ये उपआरोग्य केंद्र आहे; परंतु सातत्याने मागणी करूनही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्ध माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, लहान मुले यांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा प्राप्त होत नाहीत. गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड