शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

उमेदवारांचे भवितव्य आज होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 07:13 IST

रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील वृद्ध व अपंग मतदारांनीदेखील उत्स्फूर्तपणे मतदान केले. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ८० टक्केपर्यंत मतदान झाले आहे. रोह्यात दुपारपर्यंत ७० टक्के, महाडमध्ये ६५ टक्के, अलिबागमध्ये ७० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील एकूण मतदानाची आकडेवारी ५.३० वाजेपर्यंत ८० टक्के एवढी झाली होती.रायगड जिल्ह्यात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजपा या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी ताकद लावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तप्त होते.अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंच, तर १६४७ पैकी ५५३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १४४ जागांसाठी २५८२ विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी ७.३० ते सायं. ५.३० यादरम्यान पार पडलेल्या मतदार प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.सकाळी जिल्ह्यात ७.३० वा. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक १६.४५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी १८.९७ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत सार्वत्रिक ३७.८५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ४२.२१ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ५७.३६ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ६९.१५ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६८.३४ टक्के मतदान झाले.सकाळी ७.३०ला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदारांची मतदानासाठी गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. त्यानंतर मात्र सर्वच मतदानकेंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली होती. आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिकाधिक मते मिळवण्याकरिता कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार स्वेच्छेने आणि मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडताना दिसत होते. मतदान केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय अधिक लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी गस्त घालताना दिसून येत होते. २७६ होमगार्ड, ८० आरपीसी जवान, स्टॅटिक फोर्सचे १६० जवान तसेच ६ स्ट्रायकिंग फोर्स, जिल्ह्यातील नियमित ७५४ पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताकरिता साहाय्य करीत होते. तर मतदान प्रक्रियेसाठी महसूल विभागाच्या ९८ अधिकाºयांसह ७५३ अधिकारी तैनात करण्यात आले होते.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. कोणत्याही मतदान केंद्रावर अनूचित घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली.सोमवारी होणाºया मतमोजणीकरितादेखील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीकरिता सकाळीच बंदोबस्त तैनात करण्यात येणारआहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड