शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सावलीचा पाणीप्रश्न गंभीर, माजी सरपंच मंदा ठाकूर यांचे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:51 IST

सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून

आगरदांडा - सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले असून, मिठागर महिला व ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होवून त्यांना पाठिंबा दिला आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक अविनाश दांडेकर, अनंता ठाकूर, पंचायत समिती सदस्य आशिका ठाकूर, भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते, नितीन पवार, मानवअधिकारी संघटनेचे अध्यक्ष जाहीद फकजी, प्रवीण बैकर, उदय सबनीस, संजय भायदे, वृषाली कचरेकर, नेहा पाके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.माजी सरपंच मंदा ठाकूर यावेळी बोलताना म्हणाल्या, गेले १0 वर्षे मिठागर खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सन २00९-२0१0मध्ये ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२मध्ये मिठागर येथे राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसऱ्या योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करून एकूण १ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झाले आहेत.परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले. त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्ष पूर्ण होवून सुध्दा गावामध्ये पाण्याचा एक थेंब ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही.तथापि या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत मुरु ड तहसीलदार कार्यालयाजवळ १८एप्रील २0१७रोजी उपोषण केले होते. त्या उपोषणात शासनमार्फत तीन लेखी आश्वासने दिली होती. त्यास एक वर्ष होऊन सुध्दा शासन दरबारी अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता अथवा त्याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याचे ठौकूर यांनी सांगीतले.याबाबत शासनाला १४मार्च २0१८रोजी स्मरणपत्र देखील दिले होते, परंतु शासनाकडून कार्यवाही नाही. शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरु च राहणार असे मंदा ठाकूर अखेरीस म्हणाल्या.भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते म्हणाले की, येत्या ९ तारखेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुरु डमध्ये येणार आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२ मध्ये मिठागर येथे आणखी राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसºया योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करु न एकूण १ कोटी २५लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत.त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून ठेकेदार व अधिकाºयांवर कार्यवाही करणार असल्याचे अ‍ॅड. मोहितेने उपोषणकर्त्यांना आश्वासीत केले. शासनाचा अधिकारी दुपारपर्यंत फिरकला नाही.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या