शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

मुंबईतील एमआयडीसीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:57 IST

टाटा पॉवर औष्णिक वीज प्रकल्प : अतिरिक्त जमीन संपादन निष्पन्न

अलिबाग : टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड गावांतील अतिरिक्त संपादित जमीन परत मिळावी या मागणीकरिता गेल्या ३ जून रोजी रायगड जिल्हा प्रशासनास १५० शेतकऱ्यांनी मागणीपत्रे दाखल केली होती. त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नसल्याने,त्याच मागणी पत्रात नमूद केल्याप्रमाणे सोमवारी शहापूर ग्रामस्थांचे दैवत म्हसोबा देवास गाºहाणे घालून, शपथ घेवून तब्बल १०० शेतकरी आपल्या या मागणीच्या पूर्ततेकरिता मुंबईतील अंधेरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात रवाना झाले. याबाबतची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावांतील संपादित झालेल्या जमिनीपैकी, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या अहवालानुसार १२९.२६५ हे. आर जमीन अतिरिक्त ठरत असल्याने, सरकारी निवाडा रक्कम न स्वीकारलेले व प्रकल्पास संमती न दिलेल्या शेतकºयांची जमीन विना अधिसूचित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी सादर करावा या मागणीकरिता या दोन गावांतील १५० पेक्षा अधिक शेतकºयांनी व्यक्तिगत मागणीपत्रे ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली आहेत. तशीच मागणीपत्रे भूमी संपादन यंत्रणा असणाºया महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अंधेरी येथील कार्यालयात दाखल करीत असल्याचे भगत यांनी सांगितले.आंदोलनाचा इशाराजोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अभियंता एमआयडीसी आणि शेतकºयांची प्रतिनिधी संघटना श्रमिक मुक्ती दल यांची बैठक होत नाही तोपर्यंत संपूर्ण संपादित झालेली जमीन परस्पर दुसºया कंपनीस देण्याचा विचार देखील एमआयडीसीने करू नये तसे केल्यास अंधेरी येथील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे बंद पाडील असा इशारा शेतकरी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळास दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीalibaugअलिबागRaigadरायगड