शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भात खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे पैसे रखडले; १२ शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:17 IST

जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत या वर्षी भात खरेदी केंद्र सुरू करून देणार नाही, असा निर्धार नेरळ परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यात शेतीच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी भातपिकाचे उत्पन घेतात. या पिकविलेल्या उत्पादनाला चांगला मोबदला मिऴावा, म्हणून शासनाच्या माध्यमातून भात खरेदी केंद्राची संकल्पना राबवून शेतकऱ्यांचा भात थेट या केंद्रात खरेदी केला जाऊ लागला, परंतु गेल्या वर्षभरापासून नेरळ आणि परिसरातील १२ शेतकरी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात आपल्या विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळावे, म्हणून चकरा मारत असून, त्यांना वर्षभर वेगवेगळी कारणे आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात असून, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

शासनाच्या माध्यमातून हमखास चांगला भाव आणि पैसेही हमखास मिळणार या आशेने चांधई, कोदिवले, बार्डी, नेरळ, कळंब, उकरुळ, चिंचवली, तळवडे, भडवळ, बोरगाव, माणगांव, वंजारपाडा या गावातील १२ शेतकऱ्यांनी मागील वर्षी आपले भात या केंद्रात विक्री केली. या शेतकऱ्यांनी यावेळी बँक खात्याची माहितीही जमा केली आणि शेतकऱ्यांना भातविक्रीचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले, परंतु काही तांत्रिक अडचणी, चुका केंद्राकडून झाल्याने शासनाकडून पैसे आजपर्यंत येऊ शकले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आमचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत या वर्षी भात खरेदी केंद्र सुरू करून देणार नाही, असा निर्धार नेरळ परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

  • गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व शेतकरी वेळोवेळी नेरळ येथील भात खरेदी केंद्रात पैसे कधी मिळणार, याबाबत पाठपुरावा करत असून, आम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन कारणे दिली जात आहेत. कधी मशीनमध्ये खराबी आहे, कधी खातेक्रमांक चुकीचा दिला आहे, कधी नाव चुकीचे आहे, अशी विविध कारणे दिली जात आहेत. 
  • गेल्या वर्षभरापासून कोविडसारख्या महामारीच संकट आले. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले, यामुळे आमच्या हक्काच पैसे असूनही आम्हाला वर्षभर हेलपाटे मारावे लागत असून, अजूनही पैसे कधी मिळणार, याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. आमचे पैसे जोपर्य़ंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही केंद्राला नवीन भात खरेदी करून देणार नाही, असे कोदिवले येथील शेतकरी वसंत चहाड यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकले असून, आम्ही या शेतकऱ्यांची थकबाकी लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. ऑनलाइन कामामध्ये काही त्रुटी राहिल्याने पैसे जमा झाले नाहीत, परंतु महिनाभरात शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील. - विष्णू कालेकर, नेरळ भातविक्री केंद्राचे प्रमुख.

टॅग्स :Farmerशेतकरी