शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:03 IST

कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले.

दासगाव : कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. मात्र दोन्ही वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा नाममात्र असल्याने सांगून कार्यालयात बसूनच पंचनामे करण्यात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातही ज्या शेतकºयांनी विमा काढला आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला माहितीच नसल्याचे समोर आले आहे.महाड तालुक्यात पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाड शहराजवळ असलेल्या सावित्री नदी किनारील गावांपैकी करंजखोल, चांभारखिंड, दासगाव, तर गांधारी किनारील मोहोप्रे, नाते, लाडवली, कोल, कोथेरी, वाळण, बिरवाडी आदी गावात नुकसान होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पीक कुजले. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत म्हणून शेतकरी मागणी करत होते, मात्र ठरावीक गावातच पंचनामे झाले.जुलै ते आॅगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये केवळ १८१ शेतकºयांचे नुकसान पंचनामे करण्यात आले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे ५१.८४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या हे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकºयांना प्राप्त झालेली नाही.हीच अवस्था नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात भात पिकाचे नुकसान झाले. भात कापणीच्या वेळी पाऊस आल्याने ज्या शेतकºयांनी भात कापले होते, त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा पेंढा देखील भिजून गेला. यावेळी देखील कृषी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले. केवळ ३३ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या कागदावर नोंद करण्यात आली आहे. याबाबत विमा कंपनी देखील स्वतंत्रपणे पंचनामा करणार असल्याचे सांगितले असले तरी ज्या कंपनीचे प्रतिनिधी या विभागात कार्यरत आहेत त्यांना याबाबत माहितीच नाही.पुरातील नुकसानीचे पंचनामे करून पाठवण्यात आले आहेत तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे झाले आहेत. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही- विजय पांढरे,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी