शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:03 IST

कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले.

दासगाव : कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. मात्र दोन्ही वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा नाममात्र असल्याने सांगून कार्यालयात बसूनच पंचनामे करण्यात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातही ज्या शेतकºयांनी विमा काढला आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला माहितीच नसल्याचे समोर आले आहे.महाड तालुक्यात पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाड शहराजवळ असलेल्या सावित्री नदी किनारील गावांपैकी करंजखोल, चांभारखिंड, दासगाव, तर गांधारी किनारील मोहोप्रे, नाते, लाडवली, कोल, कोथेरी, वाळण, बिरवाडी आदी गावात नुकसान होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पीक कुजले. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत म्हणून शेतकरी मागणी करत होते, मात्र ठरावीक गावातच पंचनामे झाले.जुलै ते आॅगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये केवळ १८१ शेतकºयांचे नुकसान पंचनामे करण्यात आले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे ५१.८४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या हे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकºयांना प्राप्त झालेली नाही.हीच अवस्था नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात भात पिकाचे नुकसान झाले. भात कापणीच्या वेळी पाऊस आल्याने ज्या शेतकºयांनी भात कापले होते, त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा पेंढा देखील भिजून गेला. यावेळी देखील कृषी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले. केवळ ३३ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या कागदावर नोंद करण्यात आली आहे. याबाबत विमा कंपनी देखील स्वतंत्रपणे पंचनामा करणार असल्याचे सांगितले असले तरी ज्या कंपनीचे प्रतिनिधी या विभागात कार्यरत आहेत त्यांना याबाबत माहितीच नाही.पुरातील नुकसानीचे पंचनामे करून पाठवण्यात आले आहेत तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे झाले आहेत. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही- विजय पांढरे,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी