शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

"साळाव परिसरातील शेतकऱ्यानी जमिनी प्रकल्पाला देऊनही हात रिकामेच; नव्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्या"

By राजेश भोस्तेकर | Updated: December 28, 2022 17:13 IST

प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अलिबाग : गावाचा विकास होऊन स्थानिक सुशिक्षित तरुणाच्या हाताला काम मिळेल. या हेतूने शेतकऱ्यांनी ३३ वर्षापूर्वी आपल्या पीकत्या ७०० एकर जमिनी सिकॉम कंपनीला दिल्या. अडीचशे एकरवर प्रकल्प सुरू झाला मात्र आजही पाचशे एकर जमीन पडीक आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने दरमहा मानधन व वाढीव रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र शिल्लक जमिनीवर ना प्रकल्प उभा राहिला, ना नोकऱ्या मिळाल्या, ना मानधन दिले जात आहे वा वाढीव मोबदला ही दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अलिबाग तुषार विश्रामगृहात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुरुड तालुक्यातील मौजे चेहेर, मिठेखार येथील शेकडो शेतकऱ्यांनी १९८९ साली सिकॉम कंपनी प्रकल्पासाठी सातशे एकर जमीन अल्प दरात भुसंपादित केली होती. शेतकऱ्याकडून जमीन भुसंपादित करताना दरमहा मानधन, वाढीव मोबदला, स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन कंपनीने एमओयु करून दिले होते. कंपनीने अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला होता. त्यावेळी काही स्थानिकांना नोकरीत कंपनीने सामावून घेतले होते. त्यानंतर सिकॉमने वेलस्पूनला २००९ साली कंपनी विकली. त्यानंतर वेलस्पूनने जे एस डब्ल्यू कंपनीला विकली. सध्या जे एस डबल्यू कंपनीतर्फे प्रकल्प विस्तारीकरण केले जाणार आहे. अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

३३ वर्षात अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला असून पाचशे एकर जमीन पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन देऊनही काहीच फायदा झालेला नाही आहे. स्थानिक बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरी पासून वंचित राहिले आहेत. मानधन, वाढीव मोबदला हे दिलेले आश्वासन ही कंपनीने पाळले नाही आहे. करार नुसार मानधन, वाढीव मोबदला चालू बाजारभावाप्रमाणे द्या, १९८९ साली घेतलेल्या जमिनी खरेदी करून प्रकल्प उभारला तरी नोकरी मिळालेली नाही आहे. तरी चालू बाजार भावानुसार मोबदला द्या. स्थानिक वर टाकलेले खोटे गुन्हे मागे घ्या. आमचा नव्या होणाऱ्या प्रकल्पाला विरोध नाही मात्र आमच्या न्याय मागण्या मान्य करा अशी मागणी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड