शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"साळाव परिसरातील शेतकऱ्यानी जमिनी प्रकल्पाला देऊनही हात रिकामेच; नव्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्या"

By राजेश भोस्तेकर | Updated: December 28, 2022 17:13 IST

प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अलिबाग : गावाचा विकास होऊन स्थानिक सुशिक्षित तरुणाच्या हाताला काम मिळेल. या हेतूने शेतकऱ्यांनी ३३ वर्षापूर्वी आपल्या पीकत्या ७०० एकर जमिनी सिकॉम कंपनीला दिल्या. अडीचशे एकरवर प्रकल्प सुरू झाला मात्र आजही पाचशे एकर जमीन पडीक आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने दरमहा मानधन व वाढीव रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र शिल्लक जमिनीवर ना प्रकल्प उभा राहिला, ना नोकऱ्या मिळाल्या, ना मानधन दिले जात आहे वा वाढीव मोबदला ही दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अलिबाग तुषार विश्रामगृहात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुरुड तालुक्यातील मौजे चेहेर, मिठेखार येथील शेकडो शेतकऱ्यांनी १९८९ साली सिकॉम कंपनी प्रकल्पासाठी सातशे एकर जमीन अल्प दरात भुसंपादित केली होती. शेतकऱ्याकडून जमीन भुसंपादित करताना दरमहा मानधन, वाढीव मोबदला, स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन कंपनीने एमओयु करून दिले होते. कंपनीने अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला होता. त्यावेळी काही स्थानिकांना नोकरीत कंपनीने सामावून घेतले होते. त्यानंतर सिकॉमने वेलस्पूनला २००९ साली कंपनी विकली. त्यानंतर वेलस्पूनने जे एस डब्ल्यू कंपनीला विकली. सध्या जे एस डबल्यू कंपनीतर्फे प्रकल्प विस्तारीकरण केले जाणार आहे. अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

३३ वर्षात अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला असून पाचशे एकर जमीन पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन देऊनही काहीच फायदा झालेला नाही आहे. स्थानिक बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरी पासून वंचित राहिले आहेत. मानधन, वाढीव मोबदला हे दिलेले आश्वासन ही कंपनीने पाळले नाही आहे. करार नुसार मानधन, वाढीव मोबदला चालू बाजारभावाप्रमाणे द्या, १९८९ साली घेतलेल्या जमिनी खरेदी करून प्रकल्प उभारला तरी नोकरी मिळालेली नाही आहे. तरी चालू बाजार भावानुसार मोबदला द्या. स्थानिक वर टाकलेले खोटे गुन्हे मागे घ्या. आमचा नव्या होणाऱ्या प्रकल्पाला विरोध नाही मात्र आमच्या न्याय मागण्या मान्य करा अशी मागणी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड