शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"साळाव परिसरातील शेतकऱ्यानी जमिनी प्रकल्पाला देऊनही हात रिकामेच; नव्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्या"

By राजेश भोस्तेकर | Updated: December 28, 2022 17:13 IST

प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अलिबाग : गावाचा विकास होऊन स्थानिक सुशिक्षित तरुणाच्या हाताला काम मिळेल. या हेतूने शेतकऱ्यांनी ३३ वर्षापूर्वी आपल्या पीकत्या ७०० एकर जमिनी सिकॉम कंपनीला दिल्या. अडीचशे एकरवर प्रकल्प सुरू झाला मात्र आजही पाचशे एकर जमीन पडीक आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने दरमहा मानधन व वाढीव रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र शिल्लक जमिनीवर ना प्रकल्प उभा राहिला, ना नोकऱ्या मिळाल्या, ना मानधन दिले जात आहे वा वाढीव मोबदला ही दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अलिबाग तुषार विश्रामगृहात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुरुड तालुक्यातील मौजे चेहेर, मिठेखार येथील शेकडो शेतकऱ्यांनी १९८९ साली सिकॉम कंपनी प्रकल्पासाठी सातशे एकर जमीन अल्प दरात भुसंपादित केली होती. शेतकऱ्याकडून जमीन भुसंपादित करताना दरमहा मानधन, वाढीव मोबदला, स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन कंपनीने एमओयु करून दिले होते. कंपनीने अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला होता. त्यावेळी काही स्थानिकांना नोकरीत कंपनीने सामावून घेतले होते. त्यानंतर सिकॉमने वेलस्पूनला २००९ साली कंपनी विकली. त्यानंतर वेलस्पूनने जे एस डब्ल्यू कंपनीला विकली. सध्या जे एस डबल्यू कंपनीतर्फे प्रकल्प विस्तारीकरण केले जाणार आहे. अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

३३ वर्षात अडीचशे एकर जमिनीवर प्रकल्प उभारला असून पाचशे एकर जमीन पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन देऊनही काहीच फायदा झालेला नाही आहे. स्थानिक बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरी पासून वंचित राहिले आहेत. मानधन, वाढीव मोबदला हे दिलेले आश्वासन ही कंपनीने पाळले नाही आहे. करार नुसार मानधन, वाढीव मोबदला चालू बाजारभावाप्रमाणे द्या, १९८९ साली घेतलेल्या जमिनी खरेदी करून प्रकल्प उभारला तरी नोकरी मिळालेली नाही आहे. तरी चालू बाजार भावानुसार मोबदला द्या. स्थानिक वर टाकलेले खोटे गुन्हे मागे घ्या. आमचा नव्या होणाऱ्या प्रकल्पाला विरोध नाही मात्र आमच्या न्याय मागण्या मान्य करा अशी मागणी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड