शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पीक विम्याबाबत शेतकरी उदासीन; सरकारकडून मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:22 IST

योजना चांगली मात्र अल्प प्रतिसाद; यंदा ६ हजार ७८० शेतकऱ्यांनी उतरवला विमा

महाड : बदलते हवामान आणि नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यापासून नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.असे असले तरी जिल्ह्यातील भातपीक शेतकºयांची संख्या पाहता पीकविमा उतरवणारे शेतकरी कमी असल्याने शेतकरी पीकविम्याला फारसे प्राधान्य देत नसल्याचे चित्र दिसत आहे.शेतकरी काबाडकष्ट करून भात, कडधान्य व इतर पिके घेत असतात. परंतु बदलणारे हवामान, अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती, पिकांवर पडणारे कीडरोग यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकºयाला पीक नुकसानीची रक्कम मिळावी या उद्देशाने २०१६-१७ या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते.कोकणामध्ये या हंगामात भात, नाचणी या पिकांसाठी विमा संरक्षण मिळते. यावर्षी पीक विमा उतरवण्यासाठी शेतकºयांना मुदतवाढही देण्यात आली होती.जिल्ह्यात यावर्षी ६ हजार ७८० शेतकºयांनी पीक विमा उतरवला आहे. मागील वर्षी २ हजार ७६३ शेतकºयांनी पीक विमा उतरवलेला होता. गतवर्षी भातासाठी ७८० रुपये हेक्टरी विमा हप्त्याची रक्कम शेतकºयांना भरावी लागली होती. यावर्षी केवळ २१० रुपये हेक्टरी विमा हप्त्याची रक्कम झाल्याने जास्त शेतकºयांनी लाभ घेतला आहे. शिवाय भातासाठी ३ हजार रुपये हेक्टरी विमा संरक्षण वाढवून ४१ हजार करण्यात आले.पीक विमा काढणारे शेतकरी मागील वर्षीच्या तुलनेत जरी वाढले असले तरी जिल्ह्यातील एकूण शेतकºयांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. या पीक विमा योजनेकडे शेतकरी फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यात ३ लाख ११ हजार खातेदार शेतकरी असून प्रत्यक्षात शेती करणारे दीड लाख शेतकरी आहेत. यापैकी केवळ ६ हजार ७८० शेतकºयांनी पीक विमा उतरवलेला आहे.जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या विचारात घेता पीक विम्याला मिळालेला प्रतिसाद खूपच कमी असल्याचे दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात पर्जन्यवृष्टी, पूर व दरडीसारख्या आपत्तीही येत असतात. शिवाय खारे पाणी घुसून भातशेती तसेच कडधान्य शेतीचे नुकसान होत असल्याचे प्रकारही वारंवार घडतात. या सर्वांचा विचार करता पीक विमा उतरवण्यासाठी ज्याप्रमाणात शेतकºयांचा सहभाग हवा होता त्या प्रमाणात तो दिसत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड