शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

कंपनीने वहिवाट अडवल्याने शेतकरी संतप्त; चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या आधीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:54 IST

उरण तालुक्यातील मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणा-या वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता एका खासगी कंपनीने बंद केला आहे.

अलिबाग : उरण तालुक्यातील मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणाºया वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता एका खासगी कंपनीने बंद केला आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाच्या पूर्वीपासून वापरात होता. वनविभागाच्या हद्दीत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. या कंपनीने वनविभागाचीही वाट अडवली आहे. या विरोधात ग्रामस्थ कमालीचे संतप्त असून या प्रकरणी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत मंगळवारी स्थळपाहणी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतक-यांच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.

मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली गावांतील शेतक-यांच्या वडिलोपार्जित भातशेती या परिसरात आहे. भातशेतीत जाण्यासाठी तसेच डोंगरावर गुरे चरायला नेण्यासाठी कित्येक वर्षापासून हाच वहिवाटीचा मार्ग आहे. याच रस्त्याचा वापर डोंगरात राहणारे आदिवासी बांधव करतात. त्यामुळे हा सार्वजनिक रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्याच्या बाजूला एका लॉजिस्टिक पार्कची जागा आहे. त्याच्या जागेचा आणि रस्त्याचा काहीएक संबंध येत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याआधीही याच कंपनीवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

वहिवाटीचा रस्ता बंद केल्यामुळे शेतकºयांबरोबरच डोंगरावर गुरे चरायला नेणा-यांची गैरसोय होत आहेत. मोठी जुई, कळबुसरे, कोप्रोली गावातल्या शेतक-यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चिरनेरच्या जंगल सत्याग्रहापूर्वीपासून आमच्या वडिलोपार्जित वहिवाटीचा हा रस्ता आहे. वनविभागासह आमच्याही जमिनीवर काहींचा डोळा असल्याने परंपरागत वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. जिल्हा प्रशासनाने न्याय दिला नाही तर आंदोलन करावे लागेल, असे मोठी जुई येथील ग्रामस्थ नारायण पांडुरंग पाटील यांनी सांगितले.उसाची शेती बिबट्यांना पोषकजिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी शेतक-यांची बाजू ऐकून घेत, उरणच्या तहसीलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे शेतक-यांचे वकील अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. शेतक-यांच्या परंपरागत वहिवाटीचा रस्ता अडवण्याचा कोणत्याही व्यक्ती अथवा कंपनीला अधिकार नाही. कायदेशीरदृष्ट्या संबंधितांना रस्ता मोकळा करून द्यावाच लागेल, असेही अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतक-यांच्या तक्रारीत एका लॉजिस्टिक कंपनीने त्यांच्या परंपरागत वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचे नमूद केले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार मंगळवारी स्थळपाहणी करण्यात येणार आहे. शेतकºयांचा परंपरागत रस्ता बंद केला असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- कल्पना गोडे, तहसीलदार, उरण