शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई नसल्याचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:46 IST

२७ ठिकाणी पाणवठे : वन्यजीवांसाठी मुबलक पाणीसाठा असल्याने प्राणी लोकवस्तीत येत नसल्याचे मत

संजय करडेमुरुड : सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. रोहा, मुरुड या दोन तालुक्यांमधून हे क्षेत्र व्याप्त असल्याने वन्यजीव मुक्तपणे फिरण्याचे मोठे आवडते स्थान बनले आहे. या अभयारण्यात २७ नैसर्गिक पाण्याच्या गणी असल्याने फणसाडमधील पशूपक्ष्यांना कधीही पाण्याचा तुटवडा भासत नाही. अथवा पाण्यासाठी हे जंगल सोडून कोणताही वन्यजीव गावाकडे फिरकलेला नाही. विविध ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्याने वन्यजीवांना मुबलक पाणी मिळत असल्याचे स्पष्टीकरण फणसाड अभ्ययारण्यातर्फे करण्यात आले आहे.

या अभयारण्यात बिबट्या, हनुमान लंगूर, सांबर, भेकर, पिसोरी, ससा, रानगवा, रानटी डुक्कर, खवल्या मांजर, घोरपड, शेकरू, मोर आदीसह विविध पक्षी या अभयारण्यात तळ ठोकून आहेत. विविध सरपटणारे प्राणी यांच्यासह उपयुक्त औषधी वनस्पती यांचासुद्धा मुबलक साठा असल्याने संशोधकांचे वास्तव्य नेहमीच येथे असते. फणसाड अभयारण्य मोठमोठठ्या वृक्षांनी वेढले असल्याने येथील तापमानाची तीव्रता खूप कमी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने पावसाचे जास्त प्रमाण असून, थंड हवेचे ठिकाण म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. मे अखेरपर्यंत ते पूर्ण जून महिना असला तरी येथे असणारे काही पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. या ठिकाणी पाण्याची टंचाई भासत नसल्याने फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र प्रदीप चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.मे व जूनच्या माध्यान्ह जरी पाऊस पडला नाही, तरीसुद्धा काही ठिकाणी आम्ही बशी तलाव, पसरत तलाव, असे निर्माण केले असून सोलर पंपाद्वारे निर्माण केलेल्या तलावात पाणी सोडले जाऊन वन्यजीवांची पाण्याची सोय करण्यात आल्याची माहिती या वेळी चव्हाण यांनी दिली आहे. फणसाड अभयारण्यात एकूण सात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले असून काही ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी तीन बोअरवेल करण्यात आल्या आहेत. माकड व पक्ष्यांसाठी विविध फळझाडे लावण्यात आलेलीआहेत.

तसेच शेकरू या दुर्मीळ प्राण्याला गारंबीची वेळ हे आवडते खाद्य असून, या वृक्षांचीसुद्धा मोठी लागवड केल्याने या प्राण्याला उत्तम खाद्य मिळाल्यामुळे येत्या काळात शेकरूची संख्यासुद्धा वाढल्याचे निदर्शनास आल्याचे प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

शिकारीचे प्रमाण शून्यया अभयारण्य क्षेत्रात शिकारीचे प्रमाण शून्य असून, रात्रीची नियमित होणारी गस्त त्यामुळे शिकारीला जाणाऱ्यांचे प्रमाण बिलकूल नसल्याचे फणसाड अभयारण्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.जंगल परिसरात जास्त वृक्षतोड होऊ नये यासाठी आजूबाजूला राहणाºया सर्व ग्रामस्थांना गॅस सिलिंडरची व्यवस्था करून देण्यात आल्याने वृक्षतोड होत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.महाराष्ट्रातील तुरळक अशा अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्राण्याचे वास्तव्य आढळून येते, त्यामध्ये फणसाड अभयारण्यातीलशेकरूंची संख्या वाढत असल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.