शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वरंध भोर घाटातील पडझडीमुळे पर्यटनाला खीळ; स्थानिकांचा रोजगार बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:35 IST

पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून घाट बंद ; प्रवाशांची गैरसोय

बिरवाडी : महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून हा घाट प्रवासाकरिता धोकादायक बनला आहे. याचा परिणाम पर्यटनावरही होत असून त्यासोबतच स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणाºया वरंध भोर घाटामुळे व्यापाराला चालना मिळण्यासोबतच पावसाळ्याच्या दिवसांत डोंगरावरून वाहणारे धबधबे व निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणात या घाटाला पसंती देत असतात. मात्र, गेली दोन वर्षे मोबाइल टॉवरच्या केबलमुळे रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाºया या घाटामध्ये संरक्षक भिंत पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असल्याने हा रस्ता वाहतुकीकरिता धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दाखल होणाºया चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर दुसरीकडे वरंध भोर घाटातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीलगत असणाºया वाघजाई मंदिराजवळ वडापाव, भजी विकून आपला उदरनिर्वाह करणारे राम पवार हे १९८६ पासून वरंध भोर घाटामध्ये आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र गेल्या दोन वर्षांपासून मोबाइल टॉवरच्या केबलमुळे या घाट रस्त्याची पडझड होऊन पर्यटनाच्या हंगामामध्ये घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे राम पवार यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देण्याकरिता महाड पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटातील पडझड थांबविण्याकरिता राज्य शासनाने विशेष पावले उचलावीत, अशी मागणी महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश देशमुख यांनी केली आहे.महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये असणाºया सह्याद्रीच्या पर्वतरांगांना गिर्यारोहक, इतिहासप्रेमी नेहमीच पसंती देत असतात. पावसात येथील निसर्गरम्य देखावा कॅमेऱ्यांमध्ये टिपण्याकरिता तरुण पर्यटक या घाटाला नेहमीच पसंती देतात. मात्र सद्य:स्थितीत हा घाट वाहतुकीकरिता धोकादायक झाला असल्याने पर्यटनाला खीळ बसत आहे.

टॅग्स :tourismपर्यटन