शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भारतात प्रतिजैविक गोळ्यांचा जास्त वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:03 IST

अ‍ॅन्टिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रकारे आणि कमी प्रमाणात होण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी

अलिबाग : अ‍ॅन्टिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रकारे आणि कमी प्रमाणात होण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता जागतिक आरोग्य संघटना १६ ते २२ नोव्हेंबर हा आठवडा ‘जागतिक प्रतिजैविके जागरूकता आठवडा’ म्हणून साजरा करते. तर भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत याबाबत प्रतिवर्षी जागरूकता उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘प्रतिजैविकांच्या वापरास आळा घालणे’ विषयावरील डॉक्टरांच्या परिषदेत विचारमंथन करून संपूर्ण जिल्ह्यात याबाबत बालरोग तज्ज्ञ परिषदेच्या सदस्य डॉक्टरांनी जागरूकता उपक्रम आयोजित केल्याची माहिती भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अलिबाग शाखेचे प्रमुख डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलीआहे.एफडीएने संमती दर्शवलेल्या प्रतिजैविकांचे अयोग्य संयोजन व त्यांचा प्रचार करणारे वैद्यकीय प्रतिनिधी हेही या प्रतिरोधकतेस काही प्रमाणात कारणीभूत ठरतात. जगामध्ये प्रतिजैविकांचा सर्वात जास्त वापर भारतात होत असल्याचे दिसून आले आहे. २००० ते २०१० या काळात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून प्राप्त निष्कर्षानुसार प्रतिजैविकांच्या अमेरिकेत ६.८ अब्ज गोळ््यांची, चीनमध्ये १० अब्ज गोळ््यांची तर भारतात सर्वाधिक १२.९ अब्ज गोळ््यांची विक्री झाल्याचे आढळून आले आहे. यावरून भारतात प्रतिजैविकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट होत असल्याने भारतात जागरूकतेचे प्रयत्न प्रभावी करणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांच्या या परिषदेत व्यक्त करण्यात आले.रायगड जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरालक्ष्मी सभागृहात झालेल्या डॉक्टरांच्या या परिषदेत रायगड जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेचे जागतिक प्रतिजैविके जागरूकता आठवडा संयोजक प्रमुख डॉ.राजेंद्र चांदोरकर, डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, डॉ.राजीव धामणकर, डॉ.महेश मोहिते, डॉ.हेमंत गंगोलिया, डॉ.परवेझ शेख, डॉ.आदित्य चेवले, डॉ.वैभव देशमुख, डॉ.प्रमोद वानखेडे हे सहभागी झाले होते तर रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.विषाणूंच्या जंतू संसर्गामध्ये प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणात वापरजागतिक स्तरावर जंतुनाशक औषधांच्या वापरात भारत केंद्रबिंदू आहे. भारत ही एक मोठी औषध वसाहत असल्याने जंतुसंसर्गामुळे होणाºया आजारांचे वाढते प्रमाण, प्रतिरोधक जीवाणूंचे वेगाने वाढणारे प्रमाण, विषाणूंच्या जंतू संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी प्रतिजैविके आदी विषयांवर या परिषदेत प्रेझेंटेशनसह विचारमंथन करण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगड