शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:30 IST

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे.

मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.माथेरानच्या पायाभूत सुविधेसाठी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होण्यासाठी सरकार दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाली नव्हती. त्यामुळे मागील काही काळात स्थानिक हॉटेलमालकाने रोप-वे सुरू होण्यासाठी केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानंतर स्थानिकांच्या सततच्या मागणीवरून अखेरीस रोप-वे सुरू करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. येथील मुख्य थांबा असलेल्या नौरोजी उद्यानातील माधवजी पॉइंटच्या दर्शनी भागात मातीच्या परीक्षणासाठी उत्खनन सुरू केले आहे.रोप-वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या पर्यटनस्थळाला आणखी चालना मिळणार आहे. रोप-वेने एका वेळेस ८० पर्यटक ये-जा करू शकतात. आशिया खंडातील हा सर्वात मोठा रोप-वे बनणार असून, याची लांबी १७०० मीटर आणि उंची अडीच हजार फूट आहे. कर्जत-भूतिवली-गार्बट पठार मार्गे माधवजी पॉइंटपर्यंतच्या या दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासात पर्यटकांना विविध पॉइंट्स आणि निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान न्याहाळत गाठता येणार आहे.टाटा समूह रोप-वे बनवण्यासाठी माथेरान नगरपालिकेची आणि वनविभागाची जागा व्यापणार आहेत. यामध्ये अनेक झाडांची कत्तल होणार आहे. त्याचप्रमाणे हेरिटेज असलेले माधवजी उद्यानातील बहुतांश जागा रोप-वे मधून उतरल्यावर पर्यटकांना वापरावी लागणार आहे. त्यामुळे उद्यानात फिरावयास आलेल्या अन्य पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.>माधवजी पॉइंट येथे छोटे स्टॉल्स लावून आम्ही पाच - सहा जण व्यवसाय करीत आहोत. यावर आमच्या कुटुंबाची गुजराण होत आहे. आमच्या स्टॉल्सच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून त्यामुळे आम्ही बेरोजगार होऊ. नगरपालिकेने तसेच रोप-वेच्या समूहाने काहीतरी पर्यायी रोजगाराची अथवा प्रकल्पात काम देण्याची व्यवस्था करावी.- मयूर कदम,स्टॉल्सधारक, माथेरान>माथेरानचा विकासात्मकदृष्ट्या रोप-वे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे; परंतु प्रकल्पात प्रामुख्याने स्थानिक बेरोजगारांना काम देण्यासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, रोजगारात भर पडणार आहे. व्यवसाय वृद्धिंगत होऊन आपोआपच पर्यटनक्र ांती घडेल.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

टॅग्स :Matheranमाथेरान