शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
4
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
5
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
6
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
7
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
8
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
9
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
10
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
11
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
12
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
13
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
14
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
15
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
16
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
17
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
18
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
19
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
20
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगड परिसरात उत्खनन, वनविभागाने थांबविले काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:50 IST

Raigad News : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : किल्ले रायगड परिसर हा वनसंपदेमुळे परिपूर्ण आहे. अशा वन परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन सुरू आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि पर्यावरणाला होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या जमिनीशेजारीच हे उत्खनन सुरु असल्याने हे काम सध्या थांबवले असल्याचे वनविभागाच्या वनपालांनी सांगितले.किल्ले रायगड हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. घनदाट वनांनी व्यापलेला परिसर आज रायगड संवर्धनाच्या कामात मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  नेवाळी परिसरात रायगड संवर्धनासाठी लागणाऱ्या दगडासाठी उत्खनन केले जात आहे. याकरिता या जमिनीवर यांत्रिक साधनांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. यातील दगड काढून मूळ जमीन मालकाला सपाटीकरण करून देण्याचे ठरले असल्याचे येथे काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितले. किल्ले रायगडाच्या वाघोली खिंड आणि हिरकणीवाडी दरम्यान हे उत्खनन होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड महसूल, वनविभागाकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. महाड महसूल विभागाच्या तलाठ्यांनीही या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केल्याचे तलाठी ए. एस. महाडिक यांनी सांगितले.'वनविभागाची जमीन याच उत्खनन होत असलेल्या जमिनीला लागून वरील बाजूने आहे. यामुळे वनविभागाची जमीनही धोक्यात आली आहे. वनविभागानेङई तक्रारीची दखल घेत पाहणी केली आणि हे काम थांबवले असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यावेळी उत्खनन करण्यास सुरुवात केली त्यावेळी वनविभागाला सांगणे अपेक्षित होते. मात्र, वनविभागाला न कळवताच काम सुरू केल्याने वनविभागाची जमीन अडचणीत आली आहे. हे उत्खनन करताना संबंधित ठेकेदाराने जेसीबी आणि ट्रॅक्टर इत्यादी यांत्रिक साधनांचा वापर केला आहे.  या उत्खननामुळे किल्ले रायगडचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी उत्खनन केले आहे त्या ठिकाणी अतिउच्च दाबाच्या तारांचा टाॅवर उभा आहे. शेजारील माती खणून काढल्याने या टाॅवरलाही धोका निर्माण झाला आहे.किल्ले रायगड परिसरात नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या भागात उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी वनविभागाची जागा आहे, अथवा नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच कार्यवाही केली जाईल.- प्रशांत शिंदे, वन अधिकारी, महाड रायगड किल्ल्याजवळ उत्खनन करण्यासाठी एक अर्ज महाड तहसील कार्यालयात दिला आहे. मात्र, किल्ल्याचा परिसर हा संवेदनशील असल्याने आणि उत्खनन करण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल.– सुरेश काशीद, तहसीलदार, महाड 

टॅग्स :Raigadरायगड