शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लाईट गेले तरी महावितरणचे अधिकारी करतात चालढकल; नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 06:38 IST

अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे  सांगितले

पनवेल - महावितरणचे अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर कशा प्रकारे चालढकल करतात. याबाबतच्या तक्रारींचा पाढाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी(दि. ८) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत नागरिकांनी वाचला.या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून, त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची  योग्य  प्रकारे अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश  आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल मनपा माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होते. 

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव देयके, मीटर बदलताना घेतले जाणारे पैसे, कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे, वीज गेल्यानंतर फोन न उचलणे अशा विविध समस्यांच्या अनुषंगाने बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या. महावितरणच्या कार्यालयात सीसी टीव्ही बसवा म्हणजे कोण खोटे बोलते ते समजेल असेही सुचविण्यात आले. 

लोकांनी किती वाट पाहायची?अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे  सांगितले; पण टोल फ्री नंबरवर अनेक वेळा व्यस्त असतो. तुम्ही लाईनवर आहात, अशी टेप वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांनी किती वेळ वाट पाहायची ते सांगा. त्यासाठी काही तरी उपाययोजना करण्यास सुचविले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण