शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मृत्यूनंतरही रक्ताच्या नात्याने अंत्यसंस्काराकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:49 IST

पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून होत आहेत अंत्यसंस्कार

कळंबोली : कोरोना महामारीमुळे अनेक नात्यांत दुरावा निर्माण होत आहे. मृत्यू झाल्यास अनेक ठिकाणी नातेवाईक समोर येत नाहीत. अंत्यसंस्काराला पाच व्यक्ती तरी सरासरी राहतात, पण कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी नाकारण्याच्या आतापर्यंत पनवेल परिसरात १० घटना घडल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.

गतवर्षापासून कोरोनाचा कहर कायम आहे. वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनामुळे अनेकांत दुरावा निर्माण झाला. पूर्वी एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले की अंत्यसंस्काराला हजारो लोकांची उपस्थिती असायची. आता तशी शासनाकडून परवानगीदेखील नाही. त्यामुळे अनेकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यालाही संसर्ग होईल या भीतीने अनेक जण येत नाहीत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात अमरधाम आणि पोदी स्मशानभूमीत शवदाहिन्यांद्वारे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती येत आहेत. पण ज्यांचे काेणीच नाही त्यांचे मात्र कर्मचारीच नातेवाईक बनत आहेत. आश्रमात राहणाऱ्या व्यक्ती, परप्रांतीय व्यक्तींचे मृत्यू झाल्यास नातेवाईक येत नाहीत, त्यामुळे पालिका कर्मचारीच अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. कोरोनाच्या काळात नात्यांतील जिव्हाळा किती रुक्ष झाला आहे याचा अनुभव अंत्यविधी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून येत आहे.

पाच जणांना परवानगी; काही मृतांच्या  नशिबी तेही नसल्याची स्थिती 

कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्काराला परवानगी दिली जात आहे. पण, कित्येक जणांना आपल्या रक्तातील पाच जणही मिळत नाहीत. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचारीच नातेवाईक बनून अंत्यविधी करीत असल्याचे चित्र आहे. अंत्यविधी करता-करता कर्मचारी हतबल झाले आहेत. काळजी घ्या, घरीच राहा आणि कोरोनाला कुठेतरी थांबवा, अशी भावना ते व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड