शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मृत्यूनंतरही रक्ताच्या नात्याने अंत्यसंस्काराकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:49 IST

पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून होत आहेत अंत्यसंस्कार

कळंबोली : कोरोना महामारीमुळे अनेक नात्यांत दुरावा निर्माण होत आहे. मृत्यू झाल्यास अनेक ठिकाणी नातेवाईक समोर येत नाहीत. अंत्यसंस्काराला पाच व्यक्ती तरी सरासरी राहतात, पण कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी नाकारण्याच्या आतापर्यंत पनवेल परिसरात १० घटना घडल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.

गतवर्षापासून कोरोनाचा कहर कायम आहे. वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनामुळे अनेकांत दुरावा निर्माण झाला. पूर्वी एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले की अंत्यसंस्काराला हजारो लोकांची उपस्थिती असायची. आता तशी शासनाकडून परवानगीदेखील नाही. त्यामुळे अनेकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यालाही संसर्ग होईल या भीतीने अनेक जण येत नाहीत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात अमरधाम आणि पोदी स्मशानभूमीत शवदाहिन्यांद्वारे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती येत आहेत. पण ज्यांचे काेणीच नाही त्यांचे मात्र कर्मचारीच नातेवाईक बनत आहेत. आश्रमात राहणाऱ्या व्यक्ती, परप्रांतीय व्यक्तींचे मृत्यू झाल्यास नातेवाईक येत नाहीत, त्यामुळे पालिका कर्मचारीच अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. कोरोनाच्या काळात नात्यांतील जिव्हाळा किती रुक्ष झाला आहे याचा अनुभव अंत्यविधी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून येत आहे.

पाच जणांना परवानगी; काही मृतांच्या  नशिबी तेही नसल्याची स्थिती 

कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्काराला परवानगी दिली जात आहे. पण, कित्येक जणांना आपल्या रक्तातील पाच जणही मिळत नाहीत. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचारीच नातेवाईक बनून अंत्यविधी करीत असल्याचे चित्र आहे. अंत्यविधी करता-करता कर्मचारी हतबल झाले आहेत. काळजी घ्या, घरीच राहा आणि कोरोनाला कुठेतरी थांबवा, अशी भावना ते व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड