शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब टेस्टच ठरणार एन्ट्री पास; पालकमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:52 IST

रायगड जिल्ह्यात १२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांसाठी नियम लागू

रायगड : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात यायचे असेल, तर स्वॅब टेस्ट करणे अनिवार्य आहे. १२ आॅगस्टनंतर येणाऱ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे, तसेच क्वारंटाइनचा कालावधी हा १० दिवसांवर आणण्यात आला असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हा शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक हे मुंबई-पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी ते रायगड जिल्ह्यातील मूळ गावी परत येतात. सर्वत्र कोरानाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मुंबई-पुणे या ठिकाणीही कोरोनाचा प्रभाव आहे. याच परिस्थितीमध्ये सण, उत्सव साजरे करावे लागत आहेत, परंतु बाहेरून जिल्ह्यात येणाºयांपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकार आणि प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यात चाकरमान्यांना यायचे असेल, तर त्यांनी १२ आॅगस्टपूर्वी येणे बंधनकारक आहे. त्यानंतर, येणाºयांकडे कोरोना स्वॅब टेस्ट केल्याचा रिपोर्ट असल्याशिवाय त्यांना ई-पास मिळणार नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्यांना ई-पास मिळणारच नाही. क्वारंटाइनची मर्यादा आधी १४ दिवसांची होती. मात्र, रायगड जिल्ह्यासाठी आता १० दिवसांची करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.गणेशोत्सव साजरा करताना सरकार आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. गणेश आगमनाच्या वेळी आणि गणेश विसर्जनाच्या वेळी कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही, तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. गणेशभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू नये, असेही आवाहन तटकरे यांनी केले.जिल्ह्यातच कोरोनाची चाचणीकोरोनाच्या चाचणीसाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात मंजूर झालेली प्रयोग शाळा २० आॅगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यातच कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.कोकणात येण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि वीर स्थानकावर या रेल्वे गाड्यांचा थांबा असणार आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरून प्रवास टळणार आहे.समाजोपयोगी कार्यक्रम करावेतगणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे यांच्यावर मंडळांनी मोठ्या प्रमाणात खर्च करू नये. त्या बदल्यात आरोग्य शिबिरांसारखे समाजोपयोगी कार्यक्रम करावेत, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबत कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.महामार्गावरील खड्डे भरण्याबाबत ठकेदारांना सूचना : जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पावसामध्ये पुन्हा खड्डे पडले आहेत. संबंधित ठकेदारांना खड्डे भरण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या