शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०२५ अखेर क्षयरोग निर्मुलन उद्दीष्ट, २०१७ अखेर जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:23 IST

सन २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरु ग्णाचे उपचाराकरीता सनियंत्रण करु न उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे.

जयंत धुळपरायगड - सन २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरु ग्णाचे उपचाराकरीता सनियंत्रण करु न उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षयरु ग्णांवर उपचार करावे, शासकीय, खाजगी वैद्यकीय यंत्रणा,औषध विक्र ेते यांच्याशी समन्वय राखावा व प्रत्येक रु ग्णांवर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष द्यावे असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रणासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर,जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अमति कराड, आयएमए अलिबागचे डॉ. सुधाकर बडिगरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त डॉ.गिरीष हुकरे, पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मीनी येवले आदी मान्यवर उपस्थित होते.सरकारी ३ हजार ५४४ तर खाजगी रुग्णालयात १ हजार ०७९ क्षयरु ग्णजिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर यांनी बैठकीत सविस्तर माहिती दिली. देशातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंतचे उदीष्ट ठरविले आहे. जिल्ह्यात सन २०१७ अखेर ३ हजार ५४४ क्षयरु ग्ण शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडे खाजगी वैद्यकीय सेवांकडे १ हजार ०७९ असे जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरु ग्ण असल्याचे डॉ.देवकर यांनी सांगीतले.खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्र ेत्यांचे सहकार्य आवश्यकजिल्ह्यात उपचार घेणाºया सर्व रु ग्णांची माहिती व रु ग्ण पूर्ण बरा होईपर्यंतचा पाठपुरावा याबाबत माहिती उपलब्ध होण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्र ेत्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाकडून यापूर्वीच परिपत्रक निर्गिमत करण्यात आले आहे.तथापि, या सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय यंत्रणांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे.उपचार पुर्ण करु न क्षयरोग निर्मुलननिदान झालेल्या क्षयरु ग्णावर उपचार पूर्ण होणे आवश्यक आहे. अर्धवट उपचार केल्यास रु ग्ण हा दाद न देणाºया क्षयरोग जंतुंचा वाहक(एमडीआर) बनतो. व नंतर त्यास उच्च पातळीचे उपचार करावे लागतात. त्यासाठी खाजगी डॉक्टर्स, क्षयरोग निदानाच्या चाचण्या करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध विक्र ेते यांच्याशी शासकीय यंत्रणा परस्परांशी समन्वय राखतील. उपचार पुर्ण करणारे रु ग्ण, डॉक्टर्स,औषध विक्र ेते यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे अशा प्रकारच्या उपयायोजना राबवून उपचार पुर्ण करु न क्षयरोग निर्मुलनाचे उदिष्ट पुर्ण करावयाचे आहे. यासाठी सर्व संबंधितांची समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले.----------------------------------------