शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कर्मचाऱ्यांचा संप : ग्रामीण आरोग्य सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:49 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारपासून काम बंदचे हत्यार उपसले आहे. येत्या कालावधीत आंदोलन अधिक तीव्र करत असताना नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढून मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मेपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महासंघाने (एनआरएचएम) दिला आहे.

अलिबाग - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारपासून काम बंदचे हत्यार उपसले आहे. येत्या कालावधीत आंदोलन अधिक तीव्र करत असताना नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढून मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मेपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महासंघाने (एनआरएचएम) दिला आहे. राज्यातील १८ हजार अधिकारी आणि कर्मचारी तसेच राज्यातील ६० हजार आशा सेविका यांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा सलाईनवर गेली आहे.कंत्राटी पध्दतीने भरती केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सरकारी सेवेमध्ये कायम करावे या प्रमुख मागणीसाठी संघटनेने ११ ते २१ एप्रिल असे सलग १० दिवस कामबंद आंदोलन केले होते. संघटनेच्या या ठाम भूमिकेमुळे २१ एप्रिल रोजी आरोग्य मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा करण्याचे मान्य केले होते. बैठकीनंतर पुढील १० दिवसांमध्ये संघटनेच्या विविध मागण्यांबाबत त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सरकारी निर्णय काढण्यात येईल, प्रथम सभा घेऊन त्या सभेमध्ये कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्या समायोजनेच्या दृष्टीने आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील पुढील पदभरती थांबवण्याबाबतचा निर्णय १० दिवसात घेण्यात येईल, समिती स्थापनेपासून तीन महिन्यांच्या कालावधीत एनआरएचएमअंतर्गत सर्व कर्मचारी यांचे समायोजन करण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी मान्य केले होते. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्र्यांसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयानुसार आणि मंजूर केलेल्या मागण्यांबाबत त्वरित पत्रक काढण्यात येईल असे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले होते.आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून संघटनेने कामबंद आंदोलनाला स्थगिती दिली होती. सरकारला १० दिवसांचा दिलेल्या अल्टीमेटमची मुदत ७ मे रोजी संपली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनापैकी फक्त महिलांची बाळंतपणातील रजा सहा महिन्यांची करण्याचे परिपत्रक काढले तेवढीच जमेची बाजू आहे. बाकीची आश्वासने हवेत विरून गेली आहेत. संघटनेचे आंदोलन दडपण्यासाठी २६ एप्रिल रोजी पत्र काढण्यात आल्याने आंदोलक कमालीचे दुखावले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.सरकारने तातडीने त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्याबाबतचा सरकारी निर्णय काढावा, त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करावे, आरोग्य विभाग, ग्रामविभागातील भरती थांबवण्यात यावी, तसेच विविध बैठकांमधील निर्णयाचे सरकारी निर्णय काढावेत, अन्यथा ८ ते १४ मे कामबंद आंदोलन, १४ मेपासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च आणि २४ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यावर संघटना ठाम आहे.सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाºया सर्व परिणामांची जबाबदारी सरकारची राहील, असेही आंदोलकांनी म्हटले आहे.ंसरकारने वेळोवेळी आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे आंदोलकांमध्ये सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे. आंदोलकांनी केलेल्या त्रिस्तरीय समिती गठीत करण्याबाबतचा सरकारी निर्णय सरकारने मंगळवारी दुपारनंतर त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. सरकार एकएक मागण्या मान्य करून वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे सरकारच्या या फसव्या प्रवृत्तीला आंदोलक भीक घालणार नाहीत. ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार.- विजय सोनोने, एनआरएचएम, संघटनेचे राज्य सचिव७०० कर्मचारी,१,८०० आशा सेविकांचा सहभागच्रायगड जिल्ह्यातील ७०० अधिकारी, कर्मचारी आणि एक हजार ८०० आशा सेविका यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य वाहिनी अशी एनआरएचएमची ओळख आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अत्यावश्यक सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, मात्र तिसºया दिवसापासून सरकारने त्यात्या ठिकाणी मनुष्यबळ पुरवावे, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना दिले असल्याचे रायगड शाखेचे विकास धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या