शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांवर भर, उरणच्या शेतकऱ्यांसोबत पशुसंवर्धन व कृषी अधिकाऱ्यांची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:25 IST

चिरनेर  ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (२४)  शेतकरी व पशुपालकांची सभा घेण्यात आली होती.

- मधुकर ठाकूर 

उरण  : शेतकऱ्यांनी भातशेती, आंबा,  भाजीपाला   उत्पादनाबरोबरच पशुपालन करून त्याचे संगोपन  करावे, देशी गाई पाळाव्यात आणि  त्यातून मिळणाऱ्या चांगल्या प्रतीच्या दुधाचा ब्रँड तयार करावा  की ज्यामुळे आपले आर्थिक उत्पन्न वाढण्याला मदत होईल असे प्रतिपादन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. गुणवंत पाटील यांनी केले.       

चिरनेर  ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (२४)  शेतकरी व पशुपालकांची सभा घेण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या  आर्थिक उन्नतीसाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात सरकारी निधी आता शासन उपलब्ध करून देत आहे.  चिरनेर परिसरातील शेतकऱ्यांना आणि  पशुपालकांना पशुसंवर्धन व शेती विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शेती व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. 

यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. गुणवंत पाटील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष डाबेराव, पशुधन पर्यवेक्षक डॉ. महेश शिंदे,  कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, पोलीसपाटील संजय पाटील तसेच कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यापुढे त्यांनी पशुपालकांना राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुक्कुट पालन, शेळी पालन, वराह पालन, पशुखाद्य व चारा निर्मिती योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच उरणचे पशुधन विकास अधिकारी  डॉ. सोमनाथ भोजने यांनी पशुपालकांना राज्यस्तरीय नावीन्य पुर्ण योजना, वैरण विकास योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना कुक्कुट पिल्ले वाटप योजना विषयी उपयुक्त माहिती दिली. 

टॅग्स :Raigadरायगड