शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृतीवर भर

By निखिल म्हात्रे | Updated: April 4, 2024 17:56 IST

जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला.

अलिबाग : जैवविविधतेची हानी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृतीवर भर देण्याची ग्वाही आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी दिली.

जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला. चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रा. महेश कांबळे, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतरच्या दोन सत्रांमध्ये डॉ. सतीश ठिगळे (भूगर्भशास्त्रज्ञ), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाचे माजी प्रमुख दत्ताराम गोंधळी, सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. नीलेश चांदोरकर, डॉ. किरण माळी या मान्यवरांनी मांडणी केली. चर्चासत्रामध्ये जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल अनुकूलन यांच्यातील परस्परसंबंध, प्रभावी धोरणे अमलात आणण्यासाठी सरकार, गैरसरकारी संस्था, स्थानिक समुदाय आणि इतर भागधारकांच्या प्रयत्नांच्या गरजेवर भर देण्यात आला.