शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृतीवर भर

By निखिल म्हात्रे | Updated: April 4, 2024 17:56 IST

जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला.

अलिबाग : जैवविविधतेची हानी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृतीवर भर देण्याची ग्वाही आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी दिली.

जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला. चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रा. महेश कांबळे, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतरच्या दोन सत्रांमध्ये डॉ. सतीश ठिगळे (भूगर्भशास्त्रज्ञ), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाचे माजी प्रमुख दत्ताराम गोंधळी, सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. नीलेश चांदोरकर, डॉ. किरण माळी या मान्यवरांनी मांडणी केली. चर्चासत्रामध्ये जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल अनुकूलन यांच्यातील परस्परसंबंध, प्रभावी धोरणे अमलात आणण्यासाठी सरकार, गैरसरकारी संस्था, स्थानिक समुदाय आणि इतर भागधारकांच्या प्रयत्नांच्या गरजेवर भर देण्यात आला.