शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:22 IST

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरती

जयंत धुळपअलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरतीचे खारे पाणी माचेला, चीर्बी, खारघाट, जांभेळा, ढोंबी, खारपाले, म्हैसबाड, देवळी, जुई अब्बास, आनंद नगर या तब्बल दहा गावांतील सुमारे २३०० एकरांत भातशेतीमध्ये घुसले. यामुळे १३०० शेतकरी कुटुंबांच्या हातातोंडाशी आलेल्या नव्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ही शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती साकव ग्रामविकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पूर्वीच्या निप्पॅन डेन्रो इस्पात तर आताच्या जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने आपल्या प्रकल्प विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जमीन भूसंपादन केली आहे. हे करताना पर्यावरणाचा व बाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता, येथील पूर्वपार असणारे पाणी वाहून जाण्याचे मार्ग मातीचा भराव करून बुजविले आहेत. त्यामुळे भरती आणि ओहटीचे प्रवाह त्याचबरोबर पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून येणारे पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने खारढोंबी, माचेला येथे समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) व जुई अब्बास गावाच्या दोन उघाड्या पूर्णपणे फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे हे खारे पाणी घुसून शेतात कापून ठेवलेले भात वाहून जावून मोठे नुकसान झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने केलेल्या या भरावामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि धोक्याच्या छायेत आलेली शेकडो एकर भातशेती या संदर्भात पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयासमोर गेल्या २३ मे २०१७ रोजी या सर्व गावांतील शेतकºयांचे उपोषण आंदोलन झाले होते. त्यावेळी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकरी, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी व पेण तहसीलदार अजय पाटणे यांची संयुक्त बैठक होऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे व फुटलेले बांध (खांडी)बांधून देण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला दिले होते. परंतु उप विभागीय महसूल अधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पंचनामे व फुटलेले बांध (खांडी) बांधून देण्याच्या कामाची अंमलबजावणी कंपनीकडून झाली नाही. अखेर उधाणाचे खारे पाणी धरमतर खाडीमधून येवून तयार व कापून ठेवलेल्या भात शेतीत घुसून हा कटू प्रसंग शेतकºयांवर ओढवला आहे.अन्यथा शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल१तुटलेले बाहेरकाठे जर लवकर बांधले नाही तर याच फुटलेल्या बांधांचे आकारमान वाढत राहील व दिवसेंदिवस खारे पाणी अधिक प्रमाणात भातशेतीत घुसण्याची प्रक्रि या सतत घडत राहून शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शिवकर यांनी स्पष्ट करुन, बाहेरकाठे युद्धपातळीवर बांधून देण्याची नैतिक जबाबदारी शासनाची असून या कामाकरिता खारभूमी खात्याला विशेष निधी उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.२२३ मे २०१७ रोजी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व कंपनीच्या वतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सामाजिक भावनेने हे काम केले पाहिजे. अन्यथा भूसंपादनासाठी माती भराव करून उभारलेल्या कारखान्याला गडगंज नफा होईल व शेतकरी मात्र उद्ध्वस्त होईल याचा कंपनीने व शासनाने विचार करावा, असे आवाहन बाधित शेतकºयांच्या वतीने त्यांनी केले आहे.पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेशसामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे आणि खारपाले-जोळे, जुई-अब्बास-जोळे पंचक्र ोशी शेतकरी मंडळ यांनी या संदर्भात पेण उप विभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व पेण तहसीलदार अजय पाटणे व खारभूमी विकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करावी अशी मागणी केली.त्यास अनुसरुन बुधवारी खारभूमी विकास खात्याच्या उप अभियंता सोनल गायकवाड, शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व शाखा अभियंता दीपक आजगावकर व खारपाले, गडाब, जुई येथील शेतकरी लक्ष्मण केणी, माणिक गावंड, हरिश्चंद्र तांडेल, काका म्हात्रे व जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी यांनी धरमतर खाडी मार्गे बोटीने जाऊन प्रत्यक्ष समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटलेल्या ठिकाणांची पाहणी केली.पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत. दोन दिवसांत पंचनामे करण्याचे काम होईल, त्यावेळी नेमक्या नुकसानीची परिस्थिती स्पष्ट होईल. पंचनामे प्राप्त होताच अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड