शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

त्यांच्या शौर्यानेच दु:खातून सावरण्याची हिंमत मिळाली, कारगील युद्धातील शहीद नामदेव पवार यांच्या पत्नीचे भावनिक उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 03:58 IST

आपल्या पतीने देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आमच्या कुटुंबास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच कुटुंबाला डोंगराएवढ्या दु:खातून सावरण्याची खरी हिंमत आणि ऊर्जा मिळाली.

- संदीप जाधवमहाड : आपल्या पतीने देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आमच्या कुटुंबास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच कुटुंबाला डोंगराएवढ्या दु:खातून सावरण्याची खरी हिंमत आणि ऊर्जा मिळाली, असे उद्गार शहीद नामदेव पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी काढले.कारगील येथील सरहद्दीवर शत्रूशी लढताना २१ सप्टेंबर १९९९ रोजी धारातिर्थी पडलेले महाड तालुक्यातील धामणे गावचे सुपुत्र लान्सनायक नामदेव पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. शहीद नामदेव यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. आज १९ वर्षांनंतर हे कुटुंब दु:खातून सावरले असले, तरी मोठ्या हिमतीने वीरपत्नी सुजाताने कुटुंबाला सावरले आहे.कारगीलमध्ये पाच पॅरारेजिमेंटमध्ये कार्यरत असताना सरहद्दीवर शत्रूशी लढताना आपल्या अनेक सहकाऱ्यांचे नामदेव पवार यांनी प्राण वाचवले. मात्र, स्वत: नामदेव यांना दुर्दैवाने हौतात्म्य पत्करावे लागले.पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलींची जबाबदारी सुजाता यांच्यावर होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुजाता यांनी आपल्या तिन्ही मुलींना उत्तम शिक्षण दिले. मोठी मुलगी संजू ही फार्मसी पदवीधर असून, दुसरी मुलगी बबली ही सातारा येथे इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर तिसरी मुलगी पूनम ही महाडमध्ये डॉ आंबेडकर महाविद्यालयात सायन्सला तिसºया वर्षात शिकत आहे. बबली हिला एसएससीमध्ये ९३ टक्के गुण मिळाले होते.धामणे गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाºया या पहिल्याच तिघी बहिणी आहेत. मुलींनी शिकून खूप मोठे व्हावे, ही आपल्या पतीची इच्छा होती. मात्र, सध्या मुलींना शिक्षण देताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पतीच्या निधनानंतर आपल्याला अनेक सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. महाड पंचायत समितीने धामणे गावात उपलब्ध करून दिलेल्या भूखंडावर महाड उत्पादक संघटनेने मोफत घर बांधून दिले आहे.घराशेजारीच शहीद नामदेव पवार यांचे पवार कुटुंबीयांनी स्मारक उभारले आहे. शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान मिळाल्यास आर्थिक विवंचना कमी होईल, अशी अपेक्षा वीरपत्नी सुजाता पवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या