शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जनतेच्या मदतीने कोरोनाचे निर्मूलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:28 IST

आदिती तटकरे : श्रीवर्धनमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करत, त्याचे निर्मूलन करण्याचे आपले ध्येय असल्याचे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेत शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला, कोरोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विविध गटांची निर्मिती करून सर्वत्र सर्वेक्षण करणार आहोत. घरात आजारी असलेल्या प्रत्येक व्यक्ती, त्याच सोबत त्या व्यक्तीच्या आजाराविषयी योग्य ती माहिती त्याच्याकडून संकलित करून, त्या व्यक्तीस आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करून, त्यास तत्काळ वैद्यकीय सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. कोरोनाचे लक्षण असणारे व्यक्ती, कोरोनाबाधित मात्र लक्षणे नसणारी व्यक्ती या सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात केलीे.   

आजाराने बाधित झाल्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. हा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सदरची मोहीम अतिशय महत्त्वाचे आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रशासनाने निर्माण केलेली टीम एका दिवसात किमान ५० व्यक्तींची चाचणी दिवसभरात करणार आहे. त्यानुसार, सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांची या मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जनतेने या सर्व घटकांना सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी  असे आवाहन तटकरे यांनी केले. दरम्यान, तटकरे यांनी भोस्ते, श्रीवर्धन शहरातील कसबा, मोहल्ला या भागात फिरून गृहभेट देत व्यक्तींचे तापमान मोजणे, त्यांच्या हाताला सॅनिटायझर लावणे, मास्क लावण्याविषयी सूचना केल्या.  श्रीवर्धन नगरपरिषदेचे प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी उपस्थित होते. आज श्रीवर्धन शहरातील विविध भागांतील घरांमध्ये जाऊन लोकांना कोरोनाविषयी सजग केले आहे. गृह भेटीदरम्यान संबंधित घरांतील व्यक्तींचे कोरोनाविषयीची लक्षणे, विचार, त्यांची कृतिशीलता या सर्व बाबी जाणून घेतल्या आहेत. माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेणे, त्याचे निराकरण करणे हे माझे दायित्व आहे.      -आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड