शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

‘नैना’विरोधात प्रांत कार्यालयासमोर एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:17 IST

२३ गावांतील ग्रामस्थ आक्रमक : सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने ‘नैना’ विरोधात उपोषणाचा एल्गार पुकारण्याचे ठरवले आहे. पनवेल येथील प्रांत कार्यालयासमोर लवकरच उपोषण करणार असल्याचे विहिघर येथील सभेत एकमताने जाहीर केले आहे. तालुक्यात येऊ घातलेला ‘नैना’ प्रकल्प, वसई विरार, अलिबाग कॉरिडोर या रस्त्याच्या विरोधात ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने विहिघर येथे सभा आयोजित केली होती. या वेळी अध्यक्ष नामदेव फडके, वामन शेळके, एकनाथ भोपी, विलास फडके, एम. पाटील, नारायण पाटील, राजेश केणी, बाळाराम फडके, डिके भोपी, विजय गुप्ता आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरात आलेल्या सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून दिलेले आहे. मात्र, तसे होत नसल्याचा आरोप खंडू फडके यांनी केला. या वेळी पनवेल प्रांत कार्यालयावर ५०० हून अधिक शेतकरी उपोषणाला बसणार असून त्याची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘नैना’ शेतकऱ्यांना भूलथापा देत असून, २०० मीटरच्या आतील जागा घेणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, या जागेवरदेखील ‘नैना’ अधिकार दाखवत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ‘नैना’ला कडाडून विरोध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने, ‘आम्हाला ‘नैना’ नको’ असा ठराव घ्यायला हवा. या वेळी सिडको अध्यक्षांना निवेदन देऊनही काही झाले नाही तर शासनाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ भोपी यांनी दिला. येथील आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करावयास हवा होता. मात्र, कोणत्याही आमदाराने अधिवेशनात ‘नैना’ संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला नाही. लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येतात. मात्र, ‘नैना’विषयी बोलण्यासाठी कोणीही येत नसल्याचा आरोप अनिल ढवळे यांनी केला.

कुळकायदा संपविण्याच्या मार्गावर सरकार आहे. रायगड अशी भूमी आहे की, येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वीदेखील नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. अद्याप भूमी अधिग्रहण कायदा संमत झालेला नाही, तर हे आपली जमीन कशी घेऊ शकतात, असा सवाल या वेळी घरत यांनी केला. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतीत ‘नैना’ नको, ‘नैना’ हटाव, असा फलक लावण्याचे आवाहन या वेळी शेतकºयांना करण्यात आले. शेतकºयांकडून ‘नैना’ हटावची शपथ घेण्यात आली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई