शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘नैना’विरोधात प्रांत कार्यालयासमोर एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:17 IST

२३ गावांतील ग्रामस्थ आक्रमक : सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने ‘नैना’ विरोधात उपोषणाचा एल्गार पुकारण्याचे ठरवले आहे. पनवेल येथील प्रांत कार्यालयासमोर लवकरच उपोषण करणार असल्याचे विहिघर येथील सभेत एकमताने जाहीर केले आहे. तालुक्यात येऊ घातलेला ‘नैना’ प्रकल्प, वसई विरार, अलिबाग कॉरिडोर या रस्त्याच्या विरोधात ‘नैना’ प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने विहिघर येथे सभा आयोजित केली होती. या वेळी अध्यक्ष नामदेव फडके, वामन शेळके, एकनाथ भोपी, विलास फडके, एम. पाटील, नारायण पाटील, राजेश केणी, बाळाराम फडके, डिके भोपी, विजय गुप्ता आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरात आलेल्या सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून दिलेले आहे. मात्र, तसे होत नसल्याचा आरोप खंडू फडके यांनी केला. या वेळी पनवेल प्रांत कार्यालयावर ५०० हून अधिक शेतकरी उपोषणाला बसणार असून त्याची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘नैना’ शेतकऱ्यांना भूलथापा देत असून, २०० मीटरच्या आतील जागा घेणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, या जागेवरदेखील ‘नैना’ अधिकार दाखवत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ‘नैना’ला कडाडून विरोध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने, ‘आम्हाला ‘नैना’ नको’ असा ठराव घ्यायला हवा. या वेळी सिडको अध्यक्षांना निवेदन देऊनही काही झाले नाही तर शासनाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ भोपी यांनी दिला. येथील आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करावयास हवा होता. मात्र, कोणत्याही आमदाराने अधिवेशनात ‘नैना’ संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला नाही. लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येतात. मात्र, ‘नैना’विषयी बोलण्यासाठी कोणीही येत नसल्याचा आरोप अनिल ढवळे यांनी केला.

कुळकायदा संपविण्याच्या मार्गावर सरकार आहे. रायगड अशी भूमी आहे की, येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वीदेखील नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. अद्याप भूमी अधिग्रहण कायदा संमत झालेला नाही, तर हे आपली जमीन कशी घेऊ शकतात, असा सवाल या वेळी घरत यांनी केला. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतीत ‘नैना’ नको, ‘नैना’ हटाव, असा फलक लावण्याचे आवाहन या वेळी शेतकºयांना करण्यात आले. शेतकºयांकडून ‘नैना’ हटावची शपथ घेण्यात आली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई