शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आदिवासींचा वन कायद्यातील सुधारणेविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:33 IST

जिल्हा प्रशासनाला निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : वन कायद्यातील सुधारणा रद्द करण्यासोबत, वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी शोषित जनआंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.वनहक्क कायदा २००६ चा प्रभाव व अंमल भारतीय वन अधिनियमापेक्षा अधिक मानला जायला हवा. तसेच केंद्र सरकारने ७ मार्च २0१९ रोजी भारतीय वन कायदा १९२७ मध्ये आदिवासी व जनविरोधी अनेक सुधारणा सुचविल्या आहेत. केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन भारतीय वन कायद्यामुळे आदिवासी आणि परंपरागत वननिवासींवर अन्याय होणार आहे. वन क्षेत्रावर वनखात्याची राजवट पुन्हा प्रस्थापित करून खाजगी कंपन्यांना रान मोकळे करायचे असा या कायद्याचा हेतू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वन गुन्हे रोखण्यासाठी वनविभागाला बंदुकी देण्याचा, स्वतंत्र जेल निर्माण करण्याचा, गोळीबार करण्याचा आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड घेण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. शिवाय वन गुन्ह्यांचा शोध घेणे, पुरावे जमा करणे, न्याय निवाडा करण्याचे सर्व अधिकार वन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

वनहक्क कायद्याने मिळालेले वनहक्क धारकांचे हक्क कमी करण्याचे किंवा जबरदस्तीने काढून घेण्याचे, कोणतेही क्षेत्र वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे अधिकार वनअधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. हे सर्व निर्णय आदिवासी बांधवांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मोर्चाला शेतकरी भवनपासून सुरुवात झाली आणि मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी अडवले. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

प्रांत कार्यालयावर आदिवासींची धडक१कर्जत : राज्यात व देशभरातील विविध जनसंघटनांनी सतत केलेल्या लढाया, आंदोलने यामुळे मंजूर झालेल्या वनहक्क कायद्याला वाचवण्यासाठी व केंद्र सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. कर्जत - खालापूर तालुक्यातील हजारो आदिवासी व जंगलवासी या मोर्चात सहभागी झाले होते.२कर्जत आमराई मैदानातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व नॅन्सी गायकवाड, अध्यक्ष केशव वाघमारे, उपाध्यक्षा सुशीला भोई, सचिव अनिल सोनावणे, ताई आगिवले, नामदेव निरगुडा, लक्ष्मण पवार यांनी केले. मोर्चा बाजारपेठेतून फिरून प्रांत कार्यालयावर पोहचला. पिढ्यान पिढ्या आदिवासी व जंगलवासीयांवर झालेल्या अन्यायाचे प्रायचित्त म्हणून केंद्र सरकारने २००६ साली वनहक्क कायदा लागू केला या कायद्यामुळे काही भागात आदिवासींना फायदा झाला, परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक भागात हा कायदा लागूच केला गेला नाही.

३कर्जत खालापूर तालुक्यासह जिल्हाभरात अनेक आदिवासींचे वनहक्काचे दावे फेटाळले गेले आहेत जे आदिवासी जंगल जमीन कसतात पण त्याचा ग्रामपंचायत पातळीवर गहाळ केला गेला आहे अशा वहिवाटधारकांना जंगलातून हुसकावले जात आहे असे असताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी या कायद्याच्या हेतूलाच छेद देणारा घटना विरोधी, लोकशाही विरोधी धोरण सध्याचे केंद्र व राज्य सरकार घेत आहे. या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने कर्जतच्या उपविभागीय महसूल कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्यावतीने प्रांत वैशाली परदेशी यांना निवेदन देण्यात आले.