शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:12 IST

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच २४२ सरपंच आता थेट जनतेमधून निवडले जाणार आहेत. १६ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच राजकीय धमाका अनुभवायला मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. पैकी २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहीर केला. सप्टेंबर आणि आॅक्टोबर या कालावधीत निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तेथील संपूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे.निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये देखील आचारसंहिता राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.थेट नगराध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आता जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय डावपेचांना जिल्ह्यात चांगलाच जोर येणार असल्याचे बोलले जाते. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असला तरी राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यामध्ये शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. काँग्रेसला अद्यापही राजकीय दिशा सापडलेली नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार असल्याचे बोलले जाते.भाजपासाठी ही निवडणूक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागेल. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागतील.जनतेमधून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने विविध राजकीय पक्षांना आतापासूनच आपल्या व्यूहरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत राजकीय वातावरण तापून राजकीय धुळवड अनुभवायला मिळणारआहे.