शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:12 IST

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच २४२ सरपंच आता थेट जनतेमधून निवडले जाणार आहेत. १६ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच राजकीय धमाका अनुभवायला मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. पैकी २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहीर केला. सप्टेंबर आणि आॅक्टोबर या कालावधीत निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तेथील संपूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे.निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये देखील आचारसंहिता राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.थेट नगराध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आता जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय डावपेचांना जिल्ह्यात चांगलाच जोर येणार असल्याचे बोलले जाते. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असला तरी राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यामध्ये शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. काँग्रेसला अद्यापही राजकीय दिशा सापडलेली नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार असल्याचे बोलले जाते.भाजपासाठी ही निवडणूक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागेल. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागतील.जनतेमधून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने विविध राजकीय पक्षांना आतापासूनच आपल्या व्यूहरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत राजकीय वातावरण तापून राजकीय धुळवड अनुभवायला मिळणारआहे.