शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:12 IST

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच २४२ सरपंच आता थेट जनतेमधून निवडले जाणार आहेत. १६ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच राजकीय धमाका अनुभवायला मिळणार आहे.रायगड जिल्ह्यातील २५३ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. पैकी २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहीर केला. सप्टेंबर आणि आॅक्टोबर या कालावधीत निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे.जिल्ह्यासह तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तेथील संपूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे.निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये देखील आचारसंहिता राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.थेट नगराध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आता जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय डावपेचांना जिल्ह्यात चांगलाच जोर येणार असल्याचे बोलले जाते. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असला तरी राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यामध्ये शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. काँग्रेसला अद्यापही राजकीय दिशा सापडलेली नसल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार असल्याचे बोलले जाते.भाजपासाठी ही निवडणूक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागेल. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागतील.जनतेमधून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने विविध राजकीय पक्षांना आतापासूनच आपल्या व्यूहरचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत राजकीय वातावरण तापून राजकीय धुळवड अनुभवायला मिळणारआहे.