शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

यंदाची निवडणूक सत्तेची नव्हे, विचारांची! - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 00:18 IST

देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत.

अलिबाग : देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत. यंदाची निवडणूक विचारांची आहे, सत्तेची नाही, अशी भूमिका रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे बोलताना स्पष्ट केली.रायगड लोकसभा मतदारसंघामधून आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केल्याचे नमूद करून रायगडच्या विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय कामे केली हे त्यांनी मतदारांना सांगावे असे जाहीर आव्हान तटकरे यांनी गीते यांना दिले. खासदार कसा नसावा असे सांगण्याची वेळ आली असल्याचे तटकरे म्हणाले.रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करणार असल्याचे गीते यांनी गुरुवारच्या सभेत बोलताना म्हटले होते, त्याचा समाचार घेताना शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गीते यांनी खुशालचौकशी करावी असे आव्हान दिले. त्या चौकशीसाठी तुम्हीच अध्यक्ष व्हा आणि बँकेत काही गडबडआढळली तर, सांगाल ते करायला तयार असल्याचेही स्पष्ट केले. आघाडीचे उमेदवार तटकरे यांना रायगड लोकसभा मतदार संघातून मताधिक्य दिले नाही तर, मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी गीते यांना लगावला.रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी काँग्रेस सरकारच्या काळातच कोकणात आरसीएफ, रिलायन्स, इस्पातसारखे मोठे प्रकल्प आले आणि हजारो रोजगार उपलब्ध झाले. रत्नागिरीचे चार वेळा आणि रायगडचे दोन वेळा खासदार बनलेल्या आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदावर असताना कोकणात एकही कारखाना आणला नाही.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून कामास सुरुवात केली आणि जनसामान्याच्या हिताची कामे करून पदाला न्याय दिला असे जगताप यांनी सांगितले.सभेच्या वेळी माजी मंत्री शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील, दापोली-खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शेकाप आमदार बाळाराम पाटील, अलिबागचे आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, शेखर निकम, आ.अनिकेत तटकरे, रायगड जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.५० हजार मतांचे मताधिक्य देणार- भास्कर जाधवराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.भास्कर जाधव यांनी दापोली आणि गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघात तटकरे यांना ५० हजार मतांचे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले. गेल्या तीस वर्षांत ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्या रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही मतदार संघात गीते स्वत:चे मत स्वत:ला देऊन बोटाला शाई लावून घेऊ शकले नाहीत असे आ.जाधव यांनी सांगितले. काँग्रेसच्या बॅ.अंतुले भवन येथे आघाडीचे उमेदवार तटकरे यांच्या समर्थनार्थ सकाळी सभा झाली. त्याप्रसंगी सुनील तटकरे,पत्नी वरदा तटकरे आदी उपस्थित होते.शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आजची नाही तर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आहे. आघाडीमधील घटक पक्षातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य केले.

टॅग्स :RaigadरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक