शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

यंदाची निवडणूक सत्तेची नव्हे, विचारांची! - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 00:18 IST

देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत.

अलिबाग : देशातील भाजपा सरकारने सर्वांचाच भ्रमनिरास केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच धोक्यात आले असल्याने आम्ही सारे एकत्र आलो आहोत. यंदाची निवडणूक विचारांची आहे, सत्तेची नाही, अशी भूमिका रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे बोलताना स्पष्ट केली.रायगड लोकसभा मतदारसंघामधून आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केल्याचे नमूद करून रायगडच्या विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय कामे केली हे त्यांनी मतदारांना सांगावे असे जाहीर आव्हान तटकरे यांनी गीते यांना दिले. खासदार कसा नसावा असे सांगण्याची वेळ आली असल्याचे तटकरे म्हणाले.रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करणार असल्याचे गीते यांनी गुरुवारच्या सभेत बोलताना म्हटले होते, त्याचा समाचार घेताना शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गीते यांनी खुशालचौकशी करावी असे आव्हान दिले. त्या चौकशीसाठी तुम्हीच अध्यक्ष व्हा आणि बँकेत काही गडबडआढळली तर, सांगाल ते करायला तयार असल्याचेही स्पष्ट केले. आघाडीचे उमेदवार तटकरे यांना रायगड लोकसभा मतदार संघातून मताधिक्य दिले नाही तर, मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी गीते यांना लगावला.रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी काँग्रेस सरकारच्या काळातच कोकणात आरसीएफ, रिलायन्स, इस्पातसारखे मोठे प्रकल्प आले आणि हजारो रोजगार उपलब्ध झाले. रत्नागिरीचे चार वेळा आणि रायगडचे दोन वेळा खासदार बनलेल्या आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदावर असताना कोकणात एकही कारखाना आणला नाही.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून कामास सुरुवात केली आणि जनसामान्याच्या हिताची कामे करून पदाला न्याय दिला असे जगताप यांनी सांगितले.सभेच्या वेळी माजी मंत्री शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील, दापोली-खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शेकाप आमदार बाळाराम पाटील, अलिबागचे आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, शेखर निकम, आ.अनिकेत तटकरे, रायगड जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.५० हजार मतांचे मताधिक्य देणार- भास्कर जाधवराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.भास्कर जाधव यांनी दापोली आणि गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघात तटकरे यांना ५० हजार मतांचे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले. गेल्या तीस वर्षांत ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्या रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही मतदार संघात गीते स्वत:चे मत स्वत:ला देऊन बोटाला शाई लावून घेऊ शकले नाहीत असे आ.जाधव यांनी सांगितले. काँग्रेसच्या बॅ.अंतुले भवन येथे आघाडीचे उमेदवार तटकरे यांच्या समर्थनार्थ सकाळी सभा झाली. त्याप्रसंगी सुनील तटकरे,पत्नी वरदा तटकरे आदी उपस्थित होते.शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आजची नाही तर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आहे. आघाडीमधील घटक पक्षातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य केले.

टॅग्स :RaigadरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक