शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अलिबाग शहरामध्ये आठ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:43 IST

आंदोलनानंतरही खेळखंडोबा सुरूच; दुरुस्तीसाठी भारनियमन केल्याचा दावा

अलिबाग : महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून २४ तास उलटले नसतानाच सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी अलिबागमधीलवीजपुरवठा तब्बल आठ तासांसाठी खंडित करण्यात आला. वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, शिवाय व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अलिबाग सब स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आठ तासांचे भारनियमन घेण्यात आले आहे आणि हे शेवटचे भारनियमन असेल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी दर मंगळवारी महावितरणकडून भारनियमन केले जायचे. या कालावधीत दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आली. यात वीजवाहक तारा बदलणे, गंजलेले खांब बदलणे, डीपीची दुरुस्ती करणे यासह अन्य तांत्रिक कामांचा समावेश होतो. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावावर भारनियमन घेतले जात असेल तर दुरुस्तीची कामे सातत्याने का केली जातात असा प्रश्न आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून सोमवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुढील काही दिवसात विजेची समस्या उद्भवणार नाही, अशी हमी महावितरणने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिली. मात्र, शिवसेनेने आंदोलन करून २४ तास उलटत नाहीत तोच महावितरणने मंगळवारी आठ तासांचे भारनियमन घेतले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला.अलिबाग सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तातडीचे आणि शेवटचे भारनियमन घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल सूर्यवंशी, अधिकारी, महावितरणसध्या पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी सात-बारा उताºयाची आवश्यकता असते; परंतु वीजच गायब असल्याने आॅनलाइन सात-बारा उतारा मिळणे कठीण झाले आहे.- शैलेश काशिनाथ पाटील, शेतकरी, अलिबाग

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग