शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अलिबाग शहरामध्ये आठ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:43 IST

आंदोलनानंतरही खेळखंडोबा सुरूच; दुरुस्तीसाठी भारनियमन केल्याचा दावा

अलिबाग : महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून २४ तास उलटले नसतानाच सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी अलिबागमधीलवीजपुरवठा तब्बल आठ तासांसाठी खंडित करण्यात आला. वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, शिवाय व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अलिबाग सब स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आठ तासांचे भारनियमन घेण्यात आले आहे आणि हे शेवटचे भारनियमन असेल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी दर मंगळवारी महावितरणकडून भारनियमन केले जायचे. या कालावधीत दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आली. यात वीजवाहक तारा बदलणे, गंजलेले खांब बदलणे, डीपीची दुरुस्ती करणे यासह अन्य तांत्रिक कामांचा समावेश होतो. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावावर भारनियमन घेतले जात असेल तर दुरुस्तीची कामे सातत्याने का केली जातात असा प्रश्न आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून सोमवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुढील काही दिवसात विजेची समस्या उद्भवणार नाही, अशी हमी महावितरणने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिली. मात्र, शिवसेनेने आंदोलन करून २४ तास उलटत नाहीत तोच महावितरणने मंगळवारी आठ तासांचे भारनियमन घेतले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला.अलिबाग सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तातडीचे आणि शेवटचे भारनियमन घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल सूर्यवंशी, अधिकारी, महावितरणसध्या पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी सात-बारा उताºयाची आवश्यकता असते; परंतु वीजच गायब असल्याने आॅनलाइन सात-बारा उतारा मिळणे कठीण झाले आहे.- शैलेश काशिनाथ पाटील, शेतकरी, अलिबाग

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग