शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

अलिबाग शहरामध्ये आठ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:43 IST

आंदोलनानंतरही खेळखंडोबा सुरूच; दुरुस्तीसाठी भारनियमन केल्याचा दावा

अलिबाग : महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून २४ तास उलटले नसतानाच सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी अलिबागमधीलवीजपुरवठा तब्बल आठ तासांसाठी खंडित करण्यात आला. वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, शिवाय व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अलिबाग सब स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आठ तासांचे भारनियमन घेण्यात आले आहे आणि हे शेवटचे भारनियमन असेल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी दर मंगळवारी महावितरणकडून भारनियमन केले जायचे. या कालावधीत दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आली. यात वीजवाहक तारा बदलणे, गंजलेले खांब बदलणे, डीपीची दुरुस्ती करणे यासह अन्य तांत्रिक कामांचा समावेश होतो. दर मंगळवारी दुरुस्तीच्या नावावर भारनियमन घेतले जात असेल तर दुरुस्तीची कामे सातत्याने का केली जातात असा प्रश्न आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून सोमवारी महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुढील काही दिवसात विजेची समस्या उद्भवणार नाही, अशी हमी महावितरणने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिली. मात्र, शिवसेनेने आंदोलन करून २४ तास उलटत नाहीत तोच महावितरणने मंगळवारी आठ तासांचे भारनियमन घेतले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागला.अलिबाग सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तातडीचे आणि शेवटचे भारनियमन घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल सूर्यवंशी, अधिकारी, महावितरणसध्या पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर धरला आहे. शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी सात-बारा उताºयाची आवश्यकता असते; परंतु वीजच गायब असल्याने आॅनलाइन सात-बारा उतारा मिळणे कठीण झाले आहे.- शैलेश काशिनाथ पाटील, शेतकरी, अलिबाग

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग