शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आठ ग्रामपंचायतींचा पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:39 IST

टंचाईने हाल : पाभरे धरणाच्या कामाला सुरुवात नाही

म्हसळा : तालुक्यातील पाभरे धरणाचे पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत असून, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वास्तविक प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश मिळाल्यानंतर कामास सुरुवात करणे गरजेचे असताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणी खाली करण्यात आले. त्या घटनेला तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा कामाला सुरु वात झाली नाही. आता आचारसंहितेचे कारण दाखवून ठेकेदाराला कार्यादेश देता येत नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, यामुळे पाण्याअभावी जनतेचे हाल होत आहेत.

कोलाडचे कनिष्ठ अभियंता चिखलीकर यांच्या म्हणण्यानुसार जर काम करायचे नव्हते मग धरणाचे पाणी खाली करण्याची काय गरज होती? मेअखेर काम करता आले असते. प्राप्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासंबंधी या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गोडसे आणि सहायक अभियंता सचिन शिंदे यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही. ज्या कर्मचाऱ्याला येथे पाठविले जाते ते तर चक्क सांगतात की, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, तुम्ही कोलाड येथे जाऊन संपर्क करा. सध्या धरणातील पाण्याची पातळी पाहता पाणी जॅकवेल खाली गेल्याने पाणी पंप बसवून जॅकवेलला पाणी घेतल्यास पुढील काही दिवस यावर उपाय निघू शकतो; परंतु कामचुकार अधिकाºयामुळे गावांवर पाणीटंचाईची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केल्याचे या तोंडसुरे नळ पाणीपुरवठा कमिटीचे महादेव पाटील यांनी सांगितले.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिका पुरवठा उपअभियंता गांगुर्डे यांना देण्यात आल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.च्म्हसळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना पाणीटंचाई भासत आहे. पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकं ती करावी लागत आहे. त्यामुळे येथे पाण्याची काही सोय करावी, अशी मागणी होत असून कृ त्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.