शहरं
Join us  
Trending Stories
1
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
4
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
5
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
6
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
7
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
8
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
9
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
10
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
11
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
12
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
13
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
14
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
15
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
16
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
17
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
18
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
19
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
20
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:39 IST

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत

- श्रीकांत नांदगावकर   लोकमत न्यूज नेटवर्कतळा : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.रायगड जिल्ह्यात जवळपास आठ हजार ७९ हेक्टरवर आंबा बागायतीचे नुकसान झाले. यावर्षी आंबाही ४० टक्के लागला असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली. येथील शेतकरी भातपिकांबरोबरच आंबा हे पीक उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत; पण आता या शेतकऱ्यांना आर्थिक साधन काहीच उरलेले नाही.शासनाकडून या चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकरी बांधवांना प्रतिझाडामागे फक्त ५०० रुपये देऊन सहानुभूती दाखवली गेली आहे; परंतु या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत ही लागवड न देता राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत बागा पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ही आंबा बागायती शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी खड्डे खोदणे, लागवड करणे, कुंपण करणे, त्याचबरोबर किमान तीन वर्षे पाणी देणे, सावली करणे, खत देणे, फवारणी करणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. ही कामे रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करून पैसे मिळत नाही. शिवाय त्यासाठी जमीन दोन हेक्टरची मर्यादा असते. म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मोठ्या योजनेत बसवून लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून शेतकरी ही लागवड करू शकेल. त्याला तशी आर्थिक मदत मिळेल व गेलेल्या बागा पुन्हा उभारी घेतील. यासाठी अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तळा तालुक्यात ६२० हेक्टरवर आंबा लागवड असून, निसर्ग वादळाने ३११.३६ हेक्टरचे आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याचे ठरविले आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार आहे. तशी यावर्षीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.    - सागर वाडकर, मंडळ अधिकारी

आंबा बागायती निसर्गाच्या कोपाने उद्ध्वस्त झाल्या; परंतु त्या पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम बनविणे गरजेचे आहे. राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यासाठी प्रयत्न केला तरच शेतकरी बांधव यासाठी तयार होतील.    - मारुती वरंडे, आंबा बागायतदार

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदारांना प्रतिझाडामागे ५०० रुपये देऊन १५ वर्षांचे झाड कायमचे गेले तर यासाठी झालेली मेहनत लक्षात घेता ही लागवड राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत बसवून शेतकरी बांधवांना आर्थिक आधार द्यावा.- कृष्णा चाळके, नुकसानग्रस्त शेतकरी.