शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:39 IST

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत

- श्रीकांत नांदगावकर   लोकमत न्यूज नेटवर्कतळा : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.रायगड जिल्ह्यात जवळपास आठ हजार ७९ हेक्टरवर आंबा बागायतीचे नुकसान झाले. यावर्षी आंबाही ४० टक्के लागला असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली. येथील शेतकरी भातपिकांबरोबरच आंबा हे पीक उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत; पण आता या शेतकऱ्यांना आर्थिक साधन काहीच उरलेले नाही.शासनाकडून या चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकरी बांधवांना प्रतिझाडामागे फक्त ५०० रुपये देऊन सहानुभूती दाखवली गेली आहे; परंतु या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत ही लागवड न देता राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत बागा पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ही आंबा बागायती शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी खड्डे खोदणे, लागवड करणे, कुंपण करणे, त्याचबरोबर किमान तीन वर्षे पाणी देणे, सावली करणे, खत देणे, फवारणी करणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. ही कामे रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करून पैसे मिळत नाही. शिवाय त्यासाठी जमीन दोन हेक्टरची मर्यादा असते. म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मोठ्या योजनेत बसवून लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून शेतकरी ही लागवड करू शकेल. त्याला तशी आर्थिक मदत मिळेल व गेलेल्या बागा पुन्हा उभारी घेतील. यासाठी अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तळा तालुक्यात ६२० हेक्टरवर आंबा लागवड असून, निसर्ग वादळाने ३११.३६ हेक्टरचे आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याचे ठरविले आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार आहे. तशी यावर्षीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.    - सागर वाडकर, मंडळ अधिकारी

आंबा बागायती निसर्गाच्या कोपाने उद्ध्वस्त झाल्या; परंतु त्या पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम बनविणे गरजेचे आहे. राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यासाठी प्रयत्न केला तरच शेतकरी बांधव यासाठी तयार होतील.    - मारुती वरंडे, आंबा बागायतदार

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदारांना प्रतिझाडामागे ५०० रुपये देऊन १५ वर्षांचे झाड कायमचे गेले तर यासाठी झालेली मेहनत लक्षात घेता ही लागवड राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत बसवून शेतकरी बांधवांना आर्थिक आधार द्यावा.- कृष्णा चाळके, नुकसानग्रस्त शेतकरी.