शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अर्थ फाउंडेशन देणार दरडग्रस्तांना घरे

By admin | Updated: June 2, 2016 01:34 IST

हाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या होत्या. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. जुई, रोहन, कोंडिवते तसेच दासगांव या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या

दासगांव : महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या होत्या. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. जुई, रोहन, कोंडिवते तसेच दासगांव या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. दासगांवमधील दरडग्रस्तांना गावामध्येच पत्र्याच्या शेड बांधून राहण्याची सोय करण्यात आली होती. गेली १० वर्षे शासनाकडून यांच्या वास्तव्याचा काहीच विचार करण्यात आला नव्हता. मात्र गेल्या एक वर्षापूर्वी यांना शेडच्या राहत्या ठिकाणची जागा देवून शासनाकडून घरासाठी ९५ हजार रु पये मंजूर करण्यात आले व ती रक्कम बांधकामाप्रमाणे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार होती. मात्र अनेक कुटुंबांनी फक्त जोते बांधले व पुढील रक्कम न मिळाल्याने अद्याप घरे बांधू शकलेले नाही. या गरीब कुटुंबांचा विचार करत पनवेल रसायनी येथील अर्थ फाउंडेशन ही संस्था स्वखर्चाने या दरडग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी पुढे आली असून या ठिकाणी दोन घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.२००५ मध्ये महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या. त्याचप्रमाणे दासगांवमध्येही दरड कोसळून ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र गेली १० वर्षे दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे शेड बांधून त्यांचे वास्तव्य करण्यात आले. अनेक संघर्षानंतर शासनाने त्यांना शेडच्या ठिकाणाची जागा घर बांधण्याकरिता आरक्षित करून दिली व घर बांधण्यासाठी शासनाकडून ९५ हजारांची मदत जाहीर केली. मात्र पैसे बांधकामाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. जवळपास २० लोकांनी पहिल्या टप्प्याचे २० हजार रुपये घेवून कर्ज काढून घरे बांधली मात्र शासनाकडून अद्याप पुढील टप्प्याचे पैसे न मिळाल्याने ही कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. पैशासाठी शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. तर ज्या लोकांनी पहिल्या टप्प्याचे पैसे घेतले मात्र त्यांची परिस्थिती नाही, अशा जवळपास ५० लोकांनी घराचे जोते बांधून शासनाच्या पैशाची वाट पाहता होते. अशी अवस्था असताना अचानक पनवेल रसायनी येथील अर्थ फाउंडेशनने या ठिकाणी हजेरी लावत आपल्या स्वखर्चाने जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात येथील सर्व गरीब कुटुंबांना घरे बांधून देणार असल्याचा विश्वास या ठिकाणच्या दरडग्रस्तांना देत, गेल्या १५ दिवसांपासून दोन घरांच्या कामाला सुरुवात केली आहे. अर्थ फाउंडेशनचे संस्थापक सिद्धेश सतेरे तसेच मिहिर पाटील हांडे या दोघांनी दरडग्रस्त ठिकाणी येऊन या लोकांची व्यथा जाणून घेतली व या ठिकाणी जेवढे गरीब कुटुंब आहेत त्यांना घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवात म्हणून सुभाष कजीवकर व जयराम निवाते या दोन दरडग्रस्तांच्या घरांच्या बांधकामाला सुरुवात केली. सध्या ही दोन घरे बांधकामासाठी कोणतेच मिस्त्री न वापरता स्वत: सिद्धेश आणि मिहिर हे मिस्त्रीचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी लागणाऱ्या कामगारांचे काम एचओसी कॉलेज आॅफ आॅर्कि टेक्चर रसायनी येथील ११ मुलांची टीम काम करत आहे. ९ मे २०१६ पासून दोन घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. एका घरासाठी सरासरी १ लाख २० हजार अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून ४ घरे बांधून पूर्ण करण्यात येणार असून आॅक्टोबर महिन्यापूर्वी इतर १० घरांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. हळूहळू या ठिकाणातील गरीब गरजू लोकांची घरे बांधून देणार असल्याचे खात्रीशीर अर्थ फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)