शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खारभुमी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच बांधबंदिस्ती वारंवार उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:58 IST

खोपट्यातील शेकडो एकर जमीन नापीक

मधुकर ठाकूर

उरण: खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत व महसुली हद्दीतील खारभुमी संरक्षणासाठी असलेले बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे मागील काही वर्षांपासून वारंवार उध्वस्त होत आहेत.खारभुमींच्या भातशेतीत समुद्राचे पाणी शिरत असल्याने शेकडो एकर शेतजमिन नापीक झाली आहे.त्याकडे खारलॅण्ड  विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नापीक जमिनीवर पीक घेणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे खारलॅण्ड विभागाने वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तीं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

खोपटे- बांधपाडा खाडी किनाऱ्यावर वसलेले पाच हजार लोकसंख्येच्या गावाला काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या समस्येने ग्रासले आहे.संरक्षक बांधबंदिस्तींच वारंवार उध्वस्त असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर भात शेतात शिरते.एकदा की समुद्राचे खारे पाणी शेतजमीनीत शिरले की जमीन नापीक ठरते.पुढील किमान तीन वर्षांपर्यंत तरी या शेतजमीनीत कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही.दरवर्षी भात शेतीच्या संरक्षक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त होण्याच्या प्रकारामुळेशेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

या नापीक जमीनीवर पीकही घेता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची येथील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. मात्र खारलॅण्ड विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

वारंवार बांधबंदिस्ती उध्वस्त करत शिरणाऱ्या समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याला पायबंद घालण्यासाठी दोन दिवसांपूर्वी खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  या विभागात पाहाणी केली. या पाहणीत ठिक- ठिकाणी बांधबंदिस्ती आणि उघाडी उध्वस्त झाले असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी बांधबंदिस्ती,उघाड्या उध्वस्त झालेल्या आहेत. त्या  ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी जाण्यासाठी मात्र मार्ग उपलब्ध नाहीत.त्यामुळे वाहन पोहचणे अवघड आहे.त्यासाठी आधी मार्ग तयार करावा लागेल त्यानंतरच उपाययोजना करणे शक्य होईल.यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. त्याआधी या कामाचे इस्टिमेंट तयार करण्याचे  आश्वासन  खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

उरण परिसरातील ठिक- ठिकाणी विकासाच्या नावाखाली समुद्रात मोठ्या प्रमाणावर माती-दगडांचे भराव केले जात आहेत. खोपटा परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्या, कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. येत आहेत. यासाठी होणाऱ्या भरावामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार बांधबंदिस्ती, उघाड्या उध्वस्त होत आहेत. उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींमुळे मात्र परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. अधिकारी पाहणी करून फक्त आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत. यासाठी खारभुमी विभागाचे होणारे दुर्लक्षच आणि अधिकारीच सर्वाधिक कारणीभूत असल्याचा आरोप येथील शेतकरी संजय ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :uran-acउरण