शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

खारभुमी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच बांधबंदिस्ती वारंवार उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:58 IST

खोपट्यातील शेकडो एकर जमीन नापीक

मधुकर ठाकूर

उरण: खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत व महसुली हद्दीतील खारभुमी संरक्षणासाठी असलेले बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे मागील काही वर्षांपासून वारंवार उध्वस्त होत आहेत.खारभुमींच्या भातशेतीत समुद्राचे पाणी शिरत असल्याने शेकडो एकर शेतजमिन नापीक झाली आहे.त्याकडे खारलॅण्ड  विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नापीक जमिनीवर पीक घेणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे खारलॅण्ड विभागाने वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तीं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

खोपटे- बांधपाडा खाडी किनाऱ्यावर वसलेले पाच हजार लोकसंख्येच्या गावाला काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या समस्येने ग्रासले आहे.संरक्षक बांधबंदिस्तींच वारंवार उध्वस्त असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर भात शेतात शिरते.एकदा की समुद्राचे खारे पाणी शेतजमीनीत शिरले की जमीन नापीक ठरते.पुढील किमान तीन वर्षांपर्यंत तरी या शेतजमीनीत कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही.दरवर्षी भात शेतीच्या संरक्षक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त होण्याच्या प्रकारामुळेशेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.

या नापीक जमीनीवर पीकही घेता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची येथील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. मात्र खारलॅण्ड विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

वारंवार बांधबंदिस्ती उध्वस्त करत शिरणाऱ्या समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याला पायबंद घालण्यासाठी दोन दिवसांपूर्वी खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  या विभागात पाहाणी केली. या पाहणीत ठिक- ठिकाणी बांधबंदिस्ती आणि उघाडी उध्वस्त झाले असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी बांधबंदिस्ती,उघाड्या उध्वस्त झालेल्या आहेत. त्या  ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी जाण्यासाठी मात्र मार्ग उपलब्ध नाहीत.त्यामुळे वाहन पोहचणे अवघड आहे.त्यासाठी आधी मार्ग तयार करावा लागेल त्यानंतरच उपाययोजना करणे शक्य होईल.यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. त्याआधी या कामाचे इस्टिमेंट तयार करण्याचे  आश्वासन  खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

उरण परिसरातील ठिक- ठिकाणी विकासाच्या नावाखाली समुद्रात मोठ्या प्रमाणावर माती-दगडांचे भराव केले जात आहेत. खोपटा परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्या, कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. येत आहेत. यासाठी होणाऱ्या भरावामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार बांधबंदिस्ती, उघाड्या उध्वस्त होत आहेत. उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींमुळे मात्र परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. अधिकारी पाहणी करून फक्त आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत. यासाठी खारभुमी विभागाचे होणारे दुर्लक्षच आणि अधिकारीच सर्वाधिक कारणीभूत असल्याचा आरोप येथील शेतकरी संजय ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :uran-acउरण