शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

रायगड संवर्धनामुळे स्थानिकांना रोजगार , पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे किल्ल्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:22 IST

रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने भरघोस निधी मंजूर केला असून, या संवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने भरघोस निधी मंजूर केला असून, या संवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे. विविध कामांसाठी लागणारे मजूर रायगड किल्ला परिसरातील गावातलेच घेतले जात असल्याने या ग्रामस्थांना एक आधार निर्माण झाला आहे. संवर्धनाच्या कामाला लागणारा दगडही याच परिसरातून घेतला जात आहे.शासनाने रायगडच्या संवर्धनाकरिता विशेष मोहीम हातात घेऊन याकरिता जवळपास ६०० कोटी रुपये मंजूर केले. यातील ५९ कोटी विविध कामांसाठी वर्गदेखील झाले. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली शास्त्रीय पद्धतीतून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. गडावरील पिण्याचे पाण्याचे स्रोत सुधारणे, दुरुस्ती करणे, ऐतिहासिक वास्तूंची रासायनिक पद्धतीने साफसफाई करणे, गडावर जाण्याकरिता असणारा पायरी मार्ग दुरुस्त करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, याकरिता लागणारा बेसॉल्ट जातीचा दगड रायगड परिसरात उपलब्ध आहे. हा दगड रायगडच्या कामाशी मिळता जुळता असल्याने स्थानिक पातळीवर हा दगड गोळा केला जात असल्याचे रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे यांनी सांगितले. रायगड परिसरातील दगडाची तपासणी करण्यात आली असता हा दगड या कामाकरिता योग्य असल्याचे दिसून आले आहे. यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांतूनच हा दगड गोळा केला जात आहे. स्थानिकांना त्याचा मोबदला आणि वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. रायगड किल्ला संवर्धनाकरिता मोठ्या प्रमाणावर लागणारा दगड हा पाचाड, हिरकणीवाडी, नेवाळी, वाळसुरे, या गावांबरोबरच महाड-रायगड रस्त्याकडेला असलेल्या गावांमधून गोळा केला जात आहे. शिवाय, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधकाम सामान किल्ल्यावर नेले जात आहे. सध्या या परिसरातील जवळपास ८० जण मजुरीवर काम करत आहेत. प्रत्येक कामगाराला प्रतिदिवस ५०० ते ३३० रुपये मजुरी दिली जात आहे. पायरी मार्गाला १० ते १२ हजार दगड आणि गडावरील बांधकामाला ९ हजार दगडांची गरज आहे. सध्या गडावर चार ते साडेचार दगड होळीच्या माळावर नेण्यात आले आहेत. चित्त दरवाजा ते हत्ती तलावापर्यंत दगडी पायऱ्या केल्या जात असून, यावर टेक्चर कोरण्यात येणार आहे.रायगडावर बांधकाम साहित्य नेण्याकरिता रायगड रोपवेचा वापर होऊ शकला असता. मात्र, रायगड रोपवेच्या माध्यमातून सामान नेणे कमी वेळेत शक्य असले तरी महागडे ठरत आहे. यामुळे रेती, लागणारा दगड, अशा प्रकारचे बांधकाम साहित्य पायºयांवरून नेण्याकरिता माणसांची गरज आहे. हे मनुष्यबळ स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून घेतले जात आहे. याकरिता नेमण्यात आलेल्या ठेकेदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनाच या कामावर घेतले जावे आणि त्यांनाच रोजगार प्राप्त करून देण्यात यावा, अशी माहिती युवराज संभाजीराजे यांनी दिली आहे.रायगड संवर्धनाच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचार विरहित काम केले जाणार आहे. रायगड संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या जाणा-या कामात स्थानिक ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग राहणार आहे. त्यांना या कामातून कशा प्रकारे रोजगार प्राप्त होईल हे पाहिले जाणार आहे.- युवराज संभाजी राजे,अध्यक्ष, रायगड प्राधिकरण

टॅग्स :Raigadरायगड