शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

पाटबंधारे विभागाने कुंडलिकेचे पाणी न सोडल्याने टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 03:21 IST

एमआयडीसीची कोणतीच पाइपलाइन फुटलेली नाही, अथवा त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे कामही सुरू नाही. पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीमधील पाणी न सोडल्यामुळे एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सलग दोन दिवस होऊ शकला नाही.

- आविष्कार देसाईअलिबाग - एमआयडीसीची कोणतीच पाइपलाइन फुटलेली नाही, अथवा त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे कामही सुरू नाही. पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीमधील पाणी न सोडल्यामुळे एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सलग दोन दिवस होऊ शकला नाही.रविवारी पाटबंधारे विभागाने दुपारी पाणी सोडल्याचे सांगितल्याने नागरिकांना पाण्याची अडचण भासणार नाही, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर.पी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ऐन दिवाळीच्या तोंडावर अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी बंद झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले. पाण्यासाठी नागरिकांची चांगलीच फरफट झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता.नागोठणे येथे एमआयडीसीची पाइपलाइन फुटली आहे. त्या पाइपचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार असल्याचे काही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रविवारी वसुबारसने दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे; परंतु शनिवारी सायंकाळपासून कोणतीच सूचना न देता पाणीपुरवठा खंडित झाला.त्यामुळे रविवारी सकाळी तरी पाणी येईल असे वाटले होते. मात्र, रविवारी सकाळीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले. काही ठिकाणी विहिरी आहेत त्यातील पाण्याचा वापर नागरिकांनी केला; परंतु पिण्यासाठी पाणी संपत आल्याने नागरिक चांगलेच हवालदिल झाले होते. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर.पी.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, पावसाळ््यामध्ये अंबा नदीचे पाणी हे गुरुत्वीय बलाने एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये येते. आता पावसाळा संपल्यामुळे कुंडलिका नदीमधील पाणी एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये येणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीचे पाणी एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये न सोडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले, अशी माहिती पाटील यांनी दिली.एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्यामुळे पाण्याचा पुरवठा झाला नाही हे चुकीचे आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. कॅनेल भरण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने रविवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरू केल्यास तो कमी दाबाने होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.ऐन दिवाळीत नागरिकांचे पाण्यावाचून हालअलिबाग नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, पाणी कमी झाल्याचे सांगण्यात आलेत्यामुळे शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही स्पष्ट केले.दरम्यान, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड