शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:42 IST

महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणे कठीण झाले आहे. गेली दोन वर्र्षांपासून या केंद्राला निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रात यावर्षी भात बियाणांचे उत्पादन देखील झालेले नाही.महाड तालुक्यात कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या तालुका बीज गुणन केंद्राला गेली दोन वर्षे निधी न प्राप्त झाल्याने याठिकाणी उत्पादन होत असलेल्या भात बियाणांचे उत्पादन यावर्षी झालेले नाही. यामुळे यावर्षी शेतकºयांना या केंद्रातून भात बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.साडेसात एकर परिसरात पसरलेल्या तालुका बीज गुणन केंद्रात भात बियाणांचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, गांडूळ खतनिर्मिती, फळबाग इत्यादी घटकांचा समावेश आहे. याठिकाणी प्रतिवर्षी जवळपास १३५ ते १४० क्विंटल भात बियाणे निर्मिती केली जात होती.स्थानिक शेतकºयांच्या मागणीनुसार किंवा बाजारात मागणी असलेले भात बियाणे याठिकाणी उत्पादन करून शेतकºयांना सवलतीने हे भात बियाणे पुरवठा केले जात होते. या माध्यमातून केंद्राला अंदाजे पाच लाख रु पये प्राप्त होत होते.बियाणांच्या उत्पादनाकरिता लागणाºया सामग्रीसाठी निधीची आवश्यकता असते, मात्र गेली दोन वर्षे निधी न मिळाल्याने यावर्षी भात बियाणे उत्पादन झाले नाही. महाडमध्ये असलेल्या बीज गुणन केंद्रावर उत्पादित केले जाणारे कर्जत २ आणि कर्जत ६ या भात बियाणांना मोठी मागणी आहे. याठिकाणी उत्तम दर्जाच्या बियाण्यांची निर्मिती झाल्यास उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल.केंद्र वाहतुकीस अडचणीचेमहाड तालुका बीज गुणन केंद्र हे महाडपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. मात्र हे केंद्र महामार्ग आणि महाडपासून आडमार्गावर असल्याने शेतकºयांना याठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. वयोवृद्ध शेतकरी या केंद्रापर्यंत जात नाहीत.काळाच्या ओघात या बीज गुणन केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष होत गेले आहे. यामुळे भविष्यात या बीज गुणन केंद्रांची अवस्था बिकट होत चालली आहे.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हरितक्रांतीची सुरवात झाली आणि शेतकºयांना कृषी क्षेत्रातील सुधारित बियाणांची आणि शिक्षणाची गरज लक्षात घेवून या केंद्रांची निर्मिती झाली.मात्र, आधुनिक काळात बियाणे तयार करणाºया अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात बीज गुणन केंद्रात भात बियाणे उपलब्ध झाले नाही तर खासगी कंपन्यांच्या उपलब्धतेवर शेतकºयांना निर्भर राहावे लागेल.याठिकाणी गेली दोन वर्षे निधी प्राप्त झालेला नाही यामुळे खर्च भागवणे अशक्य झाले आहे. यामुळे यावर्षी भात बियाणे निर्माण करता आले नाही. या बीज गुणन केंद्रातील अन्य उपक्र म सुरू असून भविष्यात याठिकाणी नर्सरी प्रस्ताव आहे.- विष्णू साळवे, उपप्रादेशिक कृषी अधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगडagricultureशेती