शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:32 IST

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते

मुरुड जंजिरा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगतात. राज्य सरकारकडूनही तशाच घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी न आल्याने अनेक कामे रखडली आहेत. राज्य सरकारच्या सी.आर.एफ. फंडाचे दोन हजार कोटी रु पये येणे बाकी आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी खर्च असलेले रस्ते मंजूर केले; परंतु जिल्ह्याला पैसे लाखांत येत असतील तर रस्त्याची कामे जलद गतीने कशी पूर्ण होणार? याशिवाय भारतीय ब्रॅण्ड असलेले डांबर रस्त्यासाठी वापरण्यास सांगितले जाते. सध्या या डांबराचा तुटवडा असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही. याबाबत नागरिकांनी मंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांनी केले.

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी सरपंच अजित कासार आदी उपस्थित होते.शहरातील जनतेने शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. तरीही निधीअभावी विकासकामे झाली नाहीत. भाजपाच्या काळात प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्यात आला आहे. हे सरकार श्रीमंतांचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

नवीद अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र आहेत. काँग्रेस पक्षाने अंतुले यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बनवले. मात्र, त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने दिलेल्या योगदानाचा त्याला विसर पडल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतकरी कामगार पक्षाचे मुरु ड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी भाषणात, कार्यकर्त्यांनी घराघरांत प्रचार करून लोकांची मते वळवली पाहिजेत. बूथ कार्यकर्त्यांनी मुरु ड नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे काम करून शहरात जास्तीत जास्त मते पाडण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीकांत सुर्वे तर आशिष दिवेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड