शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:49 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत.

दासगाव - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या माती भराव आणि खोदकामामुळे पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यातून वाट काढणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून अपघाताची शक्यताही आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वाट काढण्यासाठी ठेकेदार कंपनीने तत्काळ जेसीबी यंत्रणा उभी करून पाण्याचा निचरा केला.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून ऐन पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून खोदकाम झाले आहे. शिवाय माती भरावदेखील झाला आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात महामार्गावर पावसाचे पाणी साचू लागले आहे. डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर येऊन तुंबून राहत आहे. तसेच महामार्गावर आलेले पाणीदेखील गटारात जाण्याचा मार्ग माती भरावामुळे बंद झाला आहे. महामार्गाला असणारी गटारेही साफ न केल्याने आणि या गटारात भरावाची माती पडल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. साचून राहिलेल्या पाण्याने वाहनचालक त्रस्त झाले असून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.महामार्ग बांधकाम विभागाकडून प्रतिवर्षी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची साफसफाई केली जाते. मात्र, या वर्षी चौपदरीकरण कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने गटारे साफ केली नाहीत. पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ न करताच आपली जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर सोपवली आहे.यामुळे इंदापूर ते पोलादपूरपर्यंत ठिकठिकाणी सखल भाग असलेल्या मार्गात पाणी साचून राहिले आहे. महाड आणि परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोट रस्त्यावर येत असतो. या वर्षी खोदकाम झाल्याने पाण्याबरोबर मातीदेखील महामार्गावर येत आहे. यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना तयार झालेल्या चिखलाने अपघात होण्याचीही शक्यता आहे. महामार्ग बांधकाम विभाग सध्या आपली जबाबदारी एल अ‍ॅण्ड टी कंपनीवर सोपवली आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्याला जाण्यास वाट न मिळाल्याने एल अ‍ॅण्ड टी कंपनीची तारांबळ उडाली. बराच काळ महामार्ग वाहतुकीला अडचण आली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने याबाबत दखल घेत महामार्गावरील साचलेले पाणी दूर करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस