शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 01:43 IST

पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविला विरोध : जेएनपीटीचे साडेचार कोटी खर्चाचे काम, संघटनांनी विविध मुद्द्यांवर मागितले स्पष्टीकरण

मधुकर ठाकूर 

उरण : उरण तालुक्यातील पाणजे येथील जागेवर जेएनपीटीने समुद्रामुळे होणारी धूप थांबविण्यासाठी सरंक्षक भिंत उभारून तटबंदी करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे पाणजे परिसरातील पाणथळी जागा, दीड हेक्टर क्षेत्रावरील दुर्मीळ मॅनग्रोव्हची झाडे, सुमारे दीड लाख पक्ष्यांची घरटी, मोठ्या प्रमाणात सागरी जीवजंतू नष्ट आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणजे येथील प्रस्तावित सरंक्षक भिंतीचे काम बंद करून पाणजे पर्यावरणप्रेमी संघटना आणि ग्रामस्थांनी जेएनपीटीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे जेएनपीटीचे प्रस्तावित पाणजे संरक्षण भिंतीचे काम अडचणीत आले आहे.

जेएनपीटी बंदरामुळे समुद्रकिनाऱ्यावरच वसलेल्या पाणजे गावाची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. बंदराच्या विविध विकासकामांसाठी सातत्याने होणाºया माती-दगडाच्या भरावामुळे समुद्राच्या भरतीच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. यामुळे सात हजार वस्तीच्या पाणजे गावालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर जेएनपीटीने समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे पाणजे गावाची धूप थांबविण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे साडेचार कोटी खर्चाच्या प्रस्तावित कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.

या आधीच वनशक्ती, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान, पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती-उरण, नॅट कनेक्ट फाउंडेशन आदी विविध पर्यावरणवादी संघटनांनी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे. जेएनपीटीच्या पाणजे गावासभोवार उभारण्यात प्रस्तावित सरंक्षक भिंतीच्या कामामुळे दुर्मीळ पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात खाद्यपदार्थ आढळणाºया पाणथळी जागा नामशेष होण्याची भीती पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त करण्यात आली आहे. दीड हेक्टर क्षेत्रावरील दुर्मीळ मॅनग्रोव्हची झाडेही नष्ट होणार आहेत, तसेच सुमारे दीड लाख पक्ष्यांची घरटी आणि मोठ्या प्रमाणात सागरी जीवजंतू नष्ट होणार आहेत. त्याचबरोबर, पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत या आधीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, तर पाणजे येथील प्रस्तावित संरक्षक भिंतीच्या कामामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया स्थानिक शेकडो मच्छीमारांवर विपरित परिणाम होणार आहे. यामुळे जेएनपीटीच्या प्रस्तावित संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला विरोध असल्याची माहिती पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचे सेक्रेटरी दिलीप कोळी यांनी दिली.

जेएनपीटीच्या प्रस्तावित संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला विविध पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविलेल्या विरोधानंतर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटी विभागाने पर्यावरणवादी संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर जेएनपीटी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या प्रस्तावित पाणजे संरक्षण भिंतीचे काम अडचणीत आले आहे.पाणथळी जागांचे आरक्षण जाहीर करावेनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी, स्थलांतरित पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे वाचविण्यासाठी पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स या पाच पाणथळी जागांचे आरक्षण जाहीर करून पक्षी अभयारण्य घोषित करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटी विभाग, वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलकडे केली होती.पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश, त्याच वेळी वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलने दिले असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी दिली.

टॅग्स :environmentपर्यावरणAaditya Thackerayआदित्य ठाकरे