शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

वीज खांब कोसळल्याने ८ गावे, ३० वाड्या अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:07 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गावालगत असलेला वीज खांब शनिवारी कोसळल्याने परिसरातील आठ गावे आणि ३० वाड्यातील ४ हजार वीजग्राहकांना अंधारात बसावे लागले.

दासगाव - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणात महाड तालुक्यातील केंबुर्ली गावालगत असलेला वीज खांब शनिवारी कोसळल्याने परिसरातील आठ गावे आणि ३० वाड्यातील ४ हजार वीजग्राहकांना अंधारात बसावे लागले.महामार्गाच्या खोदकामामुळे महावितरणचे विजेचे तीन खांब कोसळण्याच्या स्थितीत होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या ३ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यानंतरही महावितरण आणि ठेकेदार कंपनीने कोणतेच पाऊल न उचलल्यामुळे शनिवारी एक वीजखांब कोसळला.मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मोºया, भराव आणि ठिकठिकाणी वळणातील डोंगर फोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.महाड तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत नदीकिनारी असलेल्या महामार्गालगत वळणावर डोंगर फोडून रुंदीकरणाचे काम उन्हाळ्यामध्ये सुरू होते. खोदकाम करतेवेळी ठेकेदारांनी चार वीज खांबांलगतच खोदकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात खांब कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.पाऊस सुरू झाल्याने खोदकाम सध्या अपूर्णावस्थेतच राहिले. वीजखांब कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाºयांनी त्या ठिकाणची पाहणी केली आणि ठेकेदार कंपनीला खांब दुरुस्तीचे पत्र दिले होते.मात्र वीज खांब दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शनिवारी रात्री मुसळधार पावसामध्ये मातीसोबत एक विजेचा खांब खाली कोसळला आणि यावर आधारित वहूर कार्यालयांतर्गत सर्व गावांना रात्रभर अंधारात रहावे लागले.केंबुर्ली मानीतील या महावितरणच्या वीज पोलवरून वहूर कार्यालयांतर्गत दासगाव, वहूर, केंबुर्ली, वीर, टोळ, सापे, दाभोळ आणि कोकरे या गावासोबत अन्य ३० वाड्यांमधील जवळपास ४ हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र पोल कोसळल्यानंतर ही सर्व गावे अंधारात गेली. आठ तासानंतर तात्पुरता वीजपुरवठा या गावांना गोरेगाव विभागामार्फत करण्यात आला आहे. मात्र तो देखील ओव्हरलोड झाला तर कधीही ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.माती खाली आल्यानंतर त्या ठिकाणी सध्या पूर्णपणे कातळी खडकाळ सरपटी भाग शिल्लक राहिला आहे. या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत काम करणे कठीण झाले आहे.महावितरण अधिकाºयांच्या ठेकेदारांकडे फेºयागेल्या वर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे छोटी-मोठी कामे निघाल्याने गावे, वाड्या ८-१० तास अंधारात रहायच्या. मात्र त्यावेळी चौपदरीकरणाचे काम सुरू नव्हते. महामार्गालगत असलेले विजेचे खांब सुरक्षित जागी हलविण्याची जबाबदारी चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीकडे आहे. मात्र त्यासाठी महावितरणचे सहकार्य अपेक्षित आहे. सध्या महावितरणच्या अधिकाºयांना वीज खांबाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीच्या दारात फेºया माराव्या लागत आहेत. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून या चार खांबांच्या दुरुस्तीचे पत्र ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. मात्र त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.मुंबई - गोवा महामार्ग बंद होण्याच्या मार्गावरपावसाचा जोर वाढल्याने कें बुर्ली गाव हद्दीतील वळणावरचे खोदकाम अपूर्णच राहिले आहे. डोंगर भागातील खोदकामामुळे चार दिवसांपूर्वी मातीचा मोठा ढिगारा महामार्गावर येवून कोसळला. पाठोपाठ, शनिवारी रात्री मातीसोबत विजेचा खांब कोसळला. त्याच परिसरात डोंगराळ भाग पोकळ झाला असून तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत त्यामुळे मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात काम करून देण्याचे आश्वासन एल अँड टी या चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीने दिले आहे.- एस. आर. खोराटे, सहाय्यक अभियंता महावितरण, महाड

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या