शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:47 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र पावसामुळे महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील मानीमध्ये डोंगराच्या अर्धवट झालेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग खचू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक मातीच्या ढिगारा मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरुन येऊन कोसळल्याने वाहतूक मंदावली होती. दरड कोसळल्याने चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जलद गतीने सुरुवात झाली आहे. खोदकाम, मोºया, मातीचे भराव ही कामे तेजीत सुरु करण्यात आलेली आहेत. कामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली यामुळे ठिकठिकाणी दुसºया टप्प्याचे काम ठेकेदार कंपनीला बंद करावे लागले. सुरुवातीच्या कामामध्ये ठेकेदार कंपनीकडून महाड तालुका हद्दीत राष्ट्रीय माहमार्गालगत चार ठिकाणी वळणावरचे डोंगर फोडण्याचे काम सुरु आहे. यापैकी केंबुर्ली गाव हद्दीत असलेल्या मानी या ठिकाणी अशाच प्रकारे चौपदरीसाठी डोंगर फोडण्याच्या कामाला पावसामुळे थांबवण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत हे काम अर्धवट राहिल्याने याठिकाणी महामार्गालगत असलेल्या या सरळच डोंगर भागाचा सततच्या लागणाºया पावसामुळे काही भाग पोकळ असून सरळ सरळ मातीचा ढीग मुंबई-गोवा महामार्गावरच कोसळू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक या भागात एक मातीचा मोठा ढिगारा येऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच कोसळला. रात्रीची वेळ आणि अंधार या ढिगाºयामुळे या मार्गावरुन जाणाºया-येणाºया वाहनांना धोकादायक स्थिती निर्माण करुन बसला होता.या अगोदर अशाच प्रकारे दोन वेळा महामार्गावर मातीचे ढिगारे येऊन कोसळले होते. या ठिकाणचे काम अर्धवट राहिल्याने ही परिस्थितीत निर्माण झाली आहे. पावसामुळे ठेकेदार कंपनीला पुढचे काम करणे अवघड आणि अडचणीचे ठरले आहे. तीन वेळा या ठिकाणी या पावसामध्ये मातीचे ढिगारे आणि मोठमोठ्या दगडी मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर येऊन कोसळल्या असल्या तरी यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी एक वेळा या ठिकाणाहून परिसरात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळून जवळपास २४ तास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.सध्या लागणाºया पावसामुळे केंबुर्ली गाव हद्दीतील यावळण भागातील डोंगराची माती खाली महामार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जरी आलेल्या मातीच्या ढिगाºयामुळे कोणते नुकसान झाले नसले तरी अशाच प्रकारे पुढे अचानक माती खाली महामार्गावर आली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सद्यस्थितीत या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून रस्त्यालगत सुरक्षा म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले असले तरी हे कुचकामी ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत याठिकाणाचे डोंगर फोडण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यातच आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याची खबरदारी घेत तात्पुरत्या स्वरुपात का होईना काहीन काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.