शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:01 IST

गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.

अलिबाग : अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम सातत्याने हापूस व अन्य आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादनात घट होत आहे.गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारेपाणी शेतीत घुसून भातशेती नापिकी झाली आहे. शेतकऱ्याच्या चरितार्थासाठी याच खारेपाटातील डोंगरउतारावर आंबा लागवड केल्यास आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते आणि त्यांतून शेतकºयांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते, हे राज्य शासन कृषी पुरस्कारप्राप्त मारुती नागू पाटील उर्फ मारुती मास्तर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अनेक शेतकºयांना आंबा बाग करण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जाऊन मार्गदर्शनही केले आहे.भातशेती नापीक झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांस आंबा बागायतीतून नवा आत्मविश्वास गवसला; परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम या आंबा बागायतदारांना सोसावा लागत असल्याने पुन्हा एकदा हा शेतकरी हवालदिल झाला आहे. औषधे आणि फवारणीचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खारेपाटातील आंबा बागायतदारांकरिता शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवे नियोजन आणि सहकार्याचा हात मिळणे आवश्यक असल्याचे मारुती मास्तर यांनी सांगितले.खारेपाटात उधाणाच्या पाण्यामुळे अनेकांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी पर्याय म्हणून अनेकांनी कडधान्य, फळलागवडीला प्राधान्य दिले. मात्र, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आता फळलागवड करणारे बागायतदार हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.अवकाळी पावसाचा फटका गतवर्षी ६५ टक्के तर यंदा ३५ टक्के उत्पादनआंबा निर्यात सुविधेची गरजगेली अनेक वर्षे अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा सर्वप्रथम मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचत आहे.ही परंपरा आबाधित राखून हापूस आंब्यातून परकीय चलन देशाला प्राप्त करून घेण्याकरिता आंबा निर्यातीची सुविधा येथे मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.बाजारपेठेत जाण्याकरिता मारुती मास्तर यांच्या बागेत सज्ज झालेला हापूस आंबा

टॅग्स :Mangoआंबा