शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दुष्काळग्रस्त तालुक्यांत उपाययोजना आखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:08 IST

राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे.

अलिबाग : राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सॅटेलाइटद्वारे झालेल्या सर्वेक्षणात या तालुक्यातील भाताचे पीक पिवळे पडल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने विविध सवलती आणि योजना देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात ७८ टक्के सरासरीने पाऊस पडला होता. त्यामुळे लोंबीला आलेला भातपीक ऐन हंगामात पिवळे पडल्याचे पाहणीत आढळून आले.दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी माणगाव तालुक्यातील १८, श्रीवर्धन तालुक्यातील ८ आणि सुधागड तालुक्यातील १० गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. या तीनही तालुक्यातील भाताच्या पिकात सुमारे २० टक्के घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत.विविध उपाययोजनांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा फायदा नक्कीच रायगड जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे.>अहवाल पाठवण्याच्या सूचनाया वर्षीच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या तालुक्यांचे मूल्यांकन करून १८० तालुके गेल्या बुधवारी दुष्काळसदृश असल्याचे जाहीर केले होते.यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील रँडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.