शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

दुष्काळग्रस्त तालुक्यांत उपाययोजना आखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:08 IST

राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे.

अलिबाग : राज्य सरकारने १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सॅटेलाइटद्वारे झालेल्या सर्वेक्षणात या तालुक्यातील भाताचे पीक पिवळे पडल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने विविध सवलती आणि योजना देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.माणगाव, श्रीवर्धन आणि सुधागड या तीन तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात ७८ टक्के सरासरीने पाऊस पडला होता. त्यामुळे लोंबीला आलेला भातपीक ऐन हंगामात पिवळे पडल्याचे पाहणीत आढळून आले.दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी माणगाव तालुक्यातील १८, श्रीवर्धन तालुक्यातील ८ आणि सुधागड तालुक्यातील १० गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. या तीनही तालुक्यातील भाताच्या पिकात सुमारे २० टक्के घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत.विविध उपाययोजनांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा फायदा नक्कीच रायगड जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे.>अहवाल पाठवण्याच्या सूचनाया वर्षीच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या तालुक्यांचे मूल्यांकन करून १८० तालुके गेल्या बुधवारी दुष्काळसदृश असल्याचे जाहीर केले होते.यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील रँडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.