शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या कोळशामुळे चालक त्रस्त; क्षमतेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक होत असल्याची नागरिकांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:53 IST

महाड औद्योगिक क्षेत्रात आणि लोटे (चिपळूण) औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरसाठी कोळसा वापरला जातो. कोळशाची ट्रक, डंपरमधून वाहतूक केली जात असून रायगड जिल्ह्यातून दिघी, रोहा आणि वडखळ या तीन ठिकाणच्या बंदरातून कोळसा भरला जातो.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रात आणि लोटे (चिपळूण) औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरसाठी कोळसा वापरला जातो. कोळशाची ट्रक, डंपरमधून वाहतूक केली जात असून रायगड जिल्ह्यातून दिघी, रोहा आणि वडखळ या तीन ठिकाणच्या बंदरातून कोळसा भरला जातो. कोळशाची वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त होत असल्याने तो मुंबई-गोवा महामार्गावर पडतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना पोलीस प्रशासन किंवा आरटीओ यांच्याकडून मात्र कोळसा वाहतुकीवर कारवाई होताना दिसत नाही.महाड औद्योगिक क्षेत्रात तसेच लोटे चिपळूण औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांमध्ये बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचा वापर केला जातो. या दोन ठिकाणी जाणारा कोळसा रायगड जिल्ह्यातून रोहा आणि वडखळ येथून जातो. कोळशाची वाहतूक राष्टÑीय महामार्गावरून ट्रक व डंपरमधून केली जाते. मात्र वाहनांमध्ये ओव्हरलोड कोळसा भरला जात असल्याने खड्डे, अवघड वळणावर वाहनातील कोळसा रस्त्यावर पडतो. कोळसा वाहनांच्या वेगामुळे उडत असल्याने त्याचा फ टका मार्गावरून चालणाºया वाहनांना तसेच दुचाकीस्वारांना व पादचाºयांना नेहमी बसतो. त्यामुळे कोळसा वाहतूक करणाºया वाहन चालक व कारचालकांमध्ये वाद होत आहेत. कोळशामुळे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे असून अनेक मोटारसायकलस्वार या पडलेल्या कोळशावरून घसरून त्यांचे अपघात झाले आहेत.चार दिवसांपूर्वी चिपळूण औद्योगिक क्षेत्र किंवा महाड औद्योगिक क्षेत्रासाठी होणाºया वाहतुकीमधून मोठ्या प्रमाणात दासगाव हद्दीत बारीक कोळसा महामार्गावर एक किलोमीटर अंतरापर्यंत पडला होता. या कोळशावरून एखादी गाडी गेली की याची मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती, तर मागून येणाºया वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकीवर महामार्ग वाहतूक शाखा पोलीस अंतर्गत तसेच आरटीओने निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कारवाईही करणे गरजेची आहे. मात्र तसे होत नसल्याने चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.दिघी, रोहा आणि वडखळपासून महाड औद्योगिक क्षेत्रात तसेच चिपळूण लोटे औद्योगिक क्षेत्रासाठी ओव्हरलोड कोळसा भरून निघालेल्या वाहनांसाठी तीन महामार्ग वाहतूक शाखा पोलीस अनुक्रमे वाकण, महाड आणि कशेडी येथे आहेत. अशा पद्धतीत बिनधास्तपणे वाहतूक करणाºया कोळशाच्या वाहतुकीवर कोणतीच मोठी कारवाई केल्याचे अद्याप दिसून येत नाही. त्यामुळे ओव्हरलोड कोळशाची वाहतूक करणाºयांचे फावले असून ते कोणालाही न जुमानता अशा प्रकारे वाहतूक करताना दिसून येतात. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस महामार्गावर तैनात दिसतात तर आरटीओ पोलीस गस्त घालताना दिसतात. एवढे असताना कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.रात्रीची वाहतूक मोठ्या प्रमाणातया दगडी कोळशाची वाहतूक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पहाटेच्या वेळी केली जाते. दोन्ही औद्योगिक क्षेत्रात लागणारा हजारो टन कोळसा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ओव्हरलोड नेला जातो. महामार्गावरील वाहतूक शाखा पोलीस एखाद्या अपघाताव्यतिरिक्त रात्रीचे दिसून येत नसले तर या दरम्यान असलेले सर्वच पोलीस ठाण्याची रात्रीची गस्ती नेहमीच सुरू असते. मात्र, त्यांच्या निदर्शनास कोळशाची होणारी ओव्हरलोड वाहतूक कशी येत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड